नवी दिल्ली / वृत्तसंस्था
2015 च्या भूकंपात उध्वस्त झालेल्या अनेक प्रकल्पांची पुन्हा उभारणी करण्याचा करार भारत आणि नेपाळ यांच्यात झाला आहे. असे 14 सांस्कृ0तक वारसा प्रकल्प पुनर्जिवीत केले जाणार आहेत. तसेच 103 आरोग्य सेवा प्रकल्पही पुन्हा प्रस्थापित पेले जाणार आहेत. भारत याकामी नेपाळला साहाय्य करणार आहे. त्यासाठी 420 कोटी नेपाळी रुपयांचा खर्च येणार आहे.
भारत आणि नेपाळ यांच्यातील या करारांवर भारतीय दूतावास, केंद्रीय प्रकल्प क्रियान्वयन समिती आणि राष्ट्रीय पुनर्निमाण प्राधिकरण या संस्थांच्या अधिकाऱयांनी स्वाक्षऱयग्ना केल्या. हे प्रकल्प नेपाळमधील ललितपूर, रासुवा, नुवाकोट, सिंधूपालचौक, रामेछाप, डोलाखा, गुल्मी, गोरखा आणि कावरे या जिल्हय़ांमध्ये पुनर्निमित होणार आहेत. भारताने नेपाळच्या भूकंपग्रस्त भागांच्या पुनर्निमाणासाठी 25 कोटी डॉलर्सचे साहाय्य देण्याचे ठरविले आहे. यात आरोग्य सेवा, सांस्कृतिक वारसा आणि शिक्षण यासाठी प्रत्येकी 50 लाख डॉलर्सच्या पॅकेजचाही समावेश आहे.