पंतप्रधान मोदी आणि देउबा यांच्या हस्ते रेल्वेमार्गाचे उद्घाटन, पहिल्या टप्प्यात जयनगर ते कुर्था रेल्वे धावणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत-नेपाळ नव्या रेल्वेसेवेला शनिवारी ग्रीन सिग्नल मिळाला. शनिवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी आणि नेपाळी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. याद्वारे दोन्ही देशांमधील रेल्वेमार्ग जयनगर-बिजलपुरा-बर्दीदासला जोडण्यात आला आहे. त्याची एकूण लांबी 69.08 किमी आहे. पहिल्या टप्प्यात 34.5 किमी रेल्वेमार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यानुसार बिहारमधील जयनगरला नेपाळमधील जनकपूरमधील कुर्था स्टेशनशी जोडण्यात आले आहे.
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा शुक्रवारी तीन दिवसांच्या भारत दौऱयावर नवी दिल्लीत दाखल झाले. ते 3 एप्रिल रोजी नेपाळमध्ये परतणार आहेत. तत्पूर्वी नेपाळचे शिष्टमंडळ विविध पातळीवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. देउबा यांच्यासोबत त्यांची पत्नी अर्जू राणा देउबा, चार कॅबिनेट मंत्री, सरकारी सचिव, वरि÷ अधिकारी आणि उद्योगपती यांच्यासह एकूण 50 जणांचे शिष्टमंडळ भारतात आले आहे. जुलै 2021 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. ते पाचव्यांदा नेपाळचे पंतप्रधान बनले आहेत. आपल्या तीन दिवसांच्या भारत भेटीदरम्यान देउबा वाराणसीलाही भेट देणार आहेत.
भारत आणि नेपाळदरम्यान नवीन रेल्वेसेवा सुरू होत असून त्यासंदर्भात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या टेनमधून फक्त भारतीय आणि नेपाळी प्रवासी प्रवास करू शकतील. शनिवारी उद्घाटनानंतर रेल्वे कर्मचारी आणि अनेक वरि÷ अधिकाऱयांसह टेन कुर्थाकडे रवाना झाली. रविवारपासून प्रवाशांसाठी सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेसेवा सुरू होणार असल्याचे डीआरएम आलोक अग्रवाल यांनी सांगितले. विशेष म्हणजे या टेनमध्ये फक्त भारतीय आणि नेपाळी प्रवासीच प्रवास करू शकतील. रेल्वे बोर्डाने यासाठी एक एसओपी जारी केली असून त्यानुसार इतर देशांतील नागरिकांना टेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
8 वर्षांनंतर रेल्वेसेवेला गती
रेल्वेसेवा ही भारत आणि नेपाळमधील जीवनवाहिनी मानली जाते. 2010 मध्ये भारत सरकारने रेल्वेसेवा विकसित करण्यासाठी 550 कोटी रुपये मंजूर केले होते. 2012 पासून यावर वेगाने काम सुरू झाले. 2014 पर्यंत दोन्ही देशांदरम्यान नेपाळी नॅरोगेजवर तीन गाडय़ा धावत होत्या, परंतु गाडय़ांच्या लांब प्रवासामुळे कोळशाचा वापर खूप वाढला होता. जुलै 2021 मध्ये, या विभागात लोकोमोटिव्ह इंजिनची वेगवान चाचणी यशस्वीपणे झाली. आता 8 वर्षांनंतर पुन्हा सेवा सुरू झाल्याने दोन्ही देशातील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.