ऑनलाईन टीम / सीतामढी :
बिहारमधील सीतामढीमध्ये भारत – नेपाळ सीमेजवळ नेपळकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जानकीनगर बॉर्डरवर नेपाळ पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यामध्ये जवळील शेतात काम करत असलेल्या एका भारतीय व्यक्तीला गोळी लागली असून त्यामध्ये त्याचा मृत झाला आहे. तर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नव्या नकशावरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाला असून सध्याच्या स्थितीला दोन्ही बॉर्डर वर पोलिस तैनात आहेत. जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.