कित्तूर चन्नम्मा येथून शहरात फेरफटका, बंद शांततेत पाळण्याचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायद्यांची तरतूद केली. यामुळे संपूर्ण देशभरातून त्याला तीव्र विरोध होताना दिसत आहे. मंगळवार दि. 8 रोजी देशबंदची हाक दिली असून येथील शेतकरी संघटनांसह इतर संघटनांनीही बंदला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. अत्यंत शांततेत बंद पाळण्यात येणार असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी आणि इतर संघटनांच्या प्रमुखांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे शेतकरी संघटनांसह आयटक, अंगणवाडी, केएसआरटीसी कर्मचारी असोसिएशन यासह इतर संघटनांच्या पदाधिकाऱयांनी बैठक घेवून बंदबाबत जोरदार चर्चा केली. कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेपेटरी ऍड. नागेश सातेरी यावेळी म्हणाले, यावेळी केंद्र सरकार शेतकऱयांवर अन्याय करत आहे. त्यामुळे सर्वांनी संघटितपणे त्याला विरोध करणे हे महत्त्वाचे आहे. मात्र हे करत असताना इतर कोणालाही त्रास होवू नये तसेच स्वयंस्फूर्तीने सर्वांनी बंदला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे. त्यामुळे शेतकऱयांना आम्ही पाठिंबा देणे हे महत्त्वाचे आहे. एपीएमसी, भाजी विपेते, इतर सर्व व्यावसायिकांनी शेतकऱयांवर होणाऱया या अन्यायाविरोधात पुढे येणे गरजेचे असून स्वतःहून सर्वांनी आपली दुकाने बंद करावीत, असे देखील आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी कित्तूर चन्नम्मा चौक येथे 10 वाजता शेतकरी तसेच इतर संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर काकतीवेस, गणपत गल्ली यासह इतर परिसरात निषेध फेरी काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन त्या ठिकाणी निदर्शने करण्याचेही ठरविण्यात आले आहे. या बैठकीमध्ये शेतकरी संघटनेचे प्रकाश नाईक, सिद्धाप्पा मोदगी, कॉ. अनिल आजगावकर, जी. व्ही. कुलकर्णी, जयश्री गुरवण्णावर, सी. एस. बिदनाळ यांच्यासह इतरांनी आपले विचार व्यक्त केले.
विविध संघटनांचा पाठिंबा
शेतकऱयांच्या या आंदोलनाला कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीतर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. आंदोलनामध्ये आम्ही सर्व जण उपस्थित राहून पाठिंबा देणार असल्याचे कल्लाप्पा कांबळे यांनी म्हटले आहे.
अंगणवाडी, विमा, केएसआरटीसी कर्मचाऱयांचाही पाठिंबा
या मोर्चाला अंगणवाडी, विमा, केएसआरटीसी, आयटक यासह इतर संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी जे आंदोलन करत आहेत ते योग्य आहे. त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करणे महत्त्वाचे असून त्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.