ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनाच्या विरोधात ट्वीट केल्यामुळे चर्चेत आहे. याचवरुन तिच्यात आणि अभिनेता दिलजीत दोसांजमध्येही ट्विटर वॉर झाले होते. अशातच आता कंगनाने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ संदर्भात पुन्हा एकदा ट्वीट केले आहे.
कंगनाचे हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. कंगनाने ‘भारत बंद’च्या विरोध वेगळ्या अंदाजात केला आहे. कंगनाने सद्गुरूंचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये आंदोलनाबाबत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडीओ शेअर करताना कंगनाने लिहिले आहे की, ‘आओ भारत को बंद कर देते हैं, यूँ तो तूफानों कि कमी नहीं इस नाव को, मगर लाओ कुल्हाड़ी कुछ छेद भी कर देते हैं, रह रह के रोज मरती है हर उम्मीद यहाँ, देशभक्तों से कहो अपने लिए देश का एक टुकडा अब तुम भी माँग लो, आजाओ सडक पे और तुम भी धरना दो, चलो आज यह किस्सा ही खत्म करते हैं.’
कंगनाच्या या ट्विटला काही सोशल मीडिया युजर्सचा सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. तर अनेकांनी कंगनाच्या या ट्वीटवर टीकाही केली असून कंगनाची ही भूमिका चुकीची असल्यांचे म्हटले आहे.