ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, भाजपचा नाही. त्यामुळे जे लोक आम्हाला पाकिस्तानात जाण्याच्या सल्ला देत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावे की, पाकिस्तानात जायचे असते तर 1947 मध्येच गेलो असतो. तेव्हा आम्हाला कोणी आडवणारे नव्हते. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू होईपर्यंत मी मरणार नाही, असे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
अब्दुल्ला यांनी नुकतीच जम्मूमध्ये एक राजकीय बैठक घेतली. यावेळी बोलताना अब्दुल्ला म्हणाले, भाजप जम्मू-काश्मीरसह लडाखमधील लोकांना खोटी आश्वासने देत आहे. मात्र, मी जम्मू-काश्मीरला पूर्वीचा दर्जा पुन्हा मिळवून देईन. आम्ही कलम 370, 35 ए पुन्हा लागू करण्यासाठी आणि नवा कायदा संपवण्यासाठी इतर पक्षांशी हातमिळवणी केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील लोकांना त्यांचे अधिकार पुन्हा मिळवून देईन, त्यानंतर मी येथून निघून जाईन, असेही अब्दुल्ला म्हणाले.