अखिल भारतीय व्यापारी संघटनेची घोषणा
नवी दिल्ली :
देशात सध्या बंदच्या काळात आर्थिक संकट ओढवले असून यातून मार्ग काढण्यासाठी विविध प्रकारच्या मार्गांनी क्यापारी क्षेत्राला चालना देण्यावर भर दिला जात आहे. यात आगामी काळात नॅशनल ई कॉमर्स मार्केटप्लेसच्या आधारावर ‘भारत मार्केट’ या योजनेचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय व्यापारी संघाकडून (सीएआयटी) सांगण्यात आले.
सदर योजनेची आखणी सीएआयटीने विविध टेक्नॉलॉजी भागीदारांना एकत्र घेऊन केली आहे. या प्लॅटफॉर्मचा उपयोग देशातील किरकोळ व्यापाऱयांना करता येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेत ही सोय दिली जाणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
लहान व्यापाऱयांसाठी दिलासा
सीएआयटीच्या माहितीनुसार ई कॉमर्स प्लॅटफार्ममध्ये देशभरातील व्यापाऱयांचा समावेश आहे. तरी येत्या काळात 95 टक्के किरकोळ क्यापाऱयांसाठी ही सोय उपलब्ध करुन देण्याचे ध्येय असल्याचे सीएआयटीचे सचिव जनरल प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे.
पायलट प्रकल्प सुरु देशात पायलट पद्धतीवर ही सेवा सुरु करण्यात आली असून यात प्रयागराज, गोरखपूर, वाराणसी, लखनऊ, कानपूर आणि बेंगळूर या ठिकाणी ही सेवा उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. तसेच देशातील 90 शहरांमध्ये येत्या दोन आठवडय़ात ही सेवा सुरु करुन येत्या वर्षभरात जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक लहान व्यापाऱयांना या सेवेशी जोडले जाणार आहे.