नवी दिल्ली : भारत आगामी 5 वर्षांच्या काळात 100 कोटी मोबाईल फोन आणि पाच कोटी टीव्ही सेट व पाच कोटी लॅपटॉप आणि टॅबलेट आदींचे उत्पादन घेण्याचे ध्येय निश्चित केल्याची माहिती केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. देशात सध्या 4 जी नेटवर्कवर काम सुरु आहे आणि 5 जीच्या परीक्षणाची तयारी सुरु असल्याचेही मंत्री प्रसाद यांनी म्हटले आहे. ते भारतीय उद्योग संघाच्या (सीआयआय) एका व्हर्चुअल कार्यक्रमात बोलत होते.
येत्या भारत 5 वर्षात एक अब्ज मोबाईल, 5 कोटी टीव्ही सेटअपसह 5 कोटी आयटी हार्डवेअर उपकरणांसह अन्य उत्पादन घेण्याची तयारी करत आहे.