कोलंबो : भारत आणि यजमान लंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना येथे शुक्रवारी खेळविला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्याने हा शेवटचा सामना केवळ औपचारिकता राहील. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी दुपारी तीन वाजता प्रारंभ होईल.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात शिखर धवनच्या कप्तानी खेळीने भारताने सात गडय़ांनी विजय मिळविला. त्यानंतर दुसऱया सामन्यात दीपक चहरच्या नाबाद 69 धावांच्या समयोचित खेळीच्या जोरावर भारताने लंकेचा 3 गडय़ांनी पराभव करत मालिका हस्तगत केली.
भारत- शिखर धवन (कर्णधार), शॉ, पडिक्कल, गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, नितिश राणा, इशान किशन, संजु सॅमसन, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, के. गौतम, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, राहुल चहर, दीपक चहर, भुवनेश्वरकुमार, साकारिया आणि सैनी.
लंका- शनाका (कर्णधार), धनजंय डिसिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पी. निशांका, सी. असलंका, हसरंगा, बंदारा, भानुका, उदारा, रमेश मेंडीस, सी. करूणारत्ने, चमिरा, संदकन, अकिला धनंजय, एस. फर्नांडो, धनंजय लक्षण, इशान जयरत्ने, जयविक्रमा, असिता फर्नांडो, रजिता, कुमारा आणि उदाना.