ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत सरकारने चीनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्सला चिनी उपकरणं हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच, जुने टेंडर रद्द करुन नवीन टेंडर जारी करा, ज्यात चीनचा सहभाग कुुठेही नसेल अशा प्रकारचे आदेश सरकारी दूरसंचार कंपन्यांना देखील दिले आहेत.
भारत सरकारने दूरसंचार विभाग, बीएसएनएल आणि एमटीएनएलला आदेश देेत सरकारी 4G यंत्रणेत चीनी उपकरणांचा वापर तात्काळ बंद करण्यास सांगितले आहे. दूरसंचार विभागात 4G कार्यान्वीत करण्यास उपयोगात येणारी चीनी उपकरणे जी वापरात आहेत किंवा नाहीत, त्यांचा वापर तात्काळ बंद करावा, असं सरकारने म्हटलेेेेेेेे आहे.
नव्या अटी आणि शर्तींसह सरकारी टेंडरमधून चिनी कंपन्यांना बाहेर ठेवणार असल्याची माहिती आहे. इतर खाजगी मोबाईल कंपन्यांनाही चिनी उपकरणांचा वापर कमी करण्यास सांगण्यात येणार आहे.