प्रतिनिधी / कणकवली:
परमहंस भालचंद्र महाराज यांचा 116 वा जन्मोत्सव सोहळा 12 ते 16 जानेवारी या कालावधीमध्ये कणकवली शहरात होणार आहे. यानिमित्त कणकवली शहरात मंडळ सजावट आणि घर सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक उमेश वाळके आणि प्रसाद अंधारी यांनी दिली. स्पर्धेसाठी फार्म भरून देणे आवश्यक आहे.
मागील तीन वर्षांपासून भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळय़ानिमित्त कणकवली शहरात सदर दीपोत्सव स्पर्धा आयोजित केली जाते. बाबांची पालखी ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावरील मंडळांसाठी परिसर सजावट व नागरिकांकरिता घर सजावट अशा दोन विभागात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा भालचंद्र महाराज संस्थान आणि नमो भालचंद्राय ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाच्या पाच दिवसांत आयोजित करण्यात आली आहे.
मंडळ सजावट स्पर्धेसाठी अनुक्रमे 11,111 रुपये, 7,777 रुपये, 5,555 रुपये तीन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. घर सजावट स्पर्धेसाठी 5,555 रुपये 3,033 रुपये व 2,222 रुपये अशी अनुक्रमे पारितोषिके देणार येणार आहेत. तर 1,111 रुपये आणि 555 रुपये अशी दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पर्यावरण सेवा योजना विभाग विद्यामंदिर हायस्कूल कणकवली यांच्याकडून प्रत्येकी सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्राr यांच्या सहयोगाने सुजाण प्रेक्षकालाही पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱया मंडळांनी आपला परिसर सजावटीबरोबरच स्वच्छ ठेवणेही गरजेचे आहे, सजावटीत विद्युत रोषणाई, मंदिर रोषणाई पाचही दिवस सुरू असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱया स्पर्धकास शंभर पैकी गुण दिले जातील. पाचही दिवस परिसर व घरासमोरील स्वच्छतेसाठी विशेष गुण देण्यात येतील. स्पर्धा कालावधीत दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत परिक्षणार्थ परीक्षकांची फेरी होईल. 16 रोजी बाबांची मिरवणूक पोहोचल्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर होईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. नाव नोंदणीसाठी संपर्क उमेश वाळके (9420209600).