प्रतिनिधी / निपाणी
भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोल्हापूर-निपाणी बससेवा बंद करण्यात आली आहे. निपाणी आगाराच्या या निर्णयामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली असून गाड्या थांबल्याने प्रवाशी- वाहकात वादावादीचे प्रकार होत आहेत.
कोल्हापूरसह इचलकरंजी, गडहिंग्लज, सातारा, सांगली आदी ठिकाणी जाणाऱ्या बसही निपाणी आगारात थांबून असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. बससेवा कधी सुरू होणार हे अनिश्चित असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.