सावंतवाडी/प्रतिनिधी –
भाषेचे संस्कार हे नेहमीच चिरंतर असतात. पर्यायाने आपली भाषा समृद्ध झाली तर आपले व्यक्तिमत्वही विकसित होते. त्यामुळेच प्रत्येकाने वाचन संस्कृती जोपासून मराठी भाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी केले.
दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज वाचनालयाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रवींद्र मडगावकर बोलत होते. यावेळी वाचनालयाचे सहसचिव तथा नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे, जेरोन लॉड्रिक गिरीधर चव्हाण, विठ्ठल सावंत, दत्ताराम सावंत आदी उपस्थित होते.