प्रतिनिधी /बेळगाव :
रोग होण्यापेक्षा रोग झाल्याच्या भितीने मृत्यू वाढताहेत. एखाद्याला साधा आजार जरी झाला तरी कुटुंब आणि समाजातून मिळणाऱया वागणुकीतून अनेकांचे मनोबल खचले जात आहे. यासाठी खरी गरज आहे ती मानसिकता सावरण्याची. असा विचार करुन बेळगावातील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील पुढे आले. कोरोना झालेल्या आणि कोरोनाच्या भितीच्या छायेखाली असलेल्या रुग्णांना प्रत्यक्ष भेटून ते मार्गदर्शन करताहेत. भिऊ नका, घाबरु नका, मरणा अगोदर मरु नका, असा संदेश देण्याचे काम ते करत आहेत.
आपल्या या कामाबद्दल सांगतानाच प्रत्येकानेच आपल्या मनात निर्माण होणाऱया प्रश्नांबद्दल सकारात्मक पध्दतीने विचार करण्याची गरज त्यांनी मांडली. रुग्ण काही प्रश्नांनी खचत आहेत. ते प्रश्न कोणते आहेत? याचा शोध आपण घेतला. दरम्यान तरुण भारतच्या वाचकांनी खालील प्रश्न आणि त्याची उत्तरे वाचून मनात विचार करावेत. कोरोनाच काय कोणताही आजार झाला तरी ही उत्तरे महत्त्वाची ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रश्नः हे आजार का येतात, आल्यावर काय केले पाहिजे?
उत्तरः एकतर वातावरणाच्या बदलामुळे छोटे मोठे आजार दर वेळेला येतातच. थंडी, ताप, कणकण, खोकला, सर्दी, पडसे असे ते आजार आहेत. या वेळेला सुध्दा हे रोग आलेले आहेत. म्हणून घाबरुन न जाता मला कोरोना झाला आहे, असे समजू नका व उगाच घाबरुन हॉस्पिटलकडे धावू नका. तत्पूर्वी काही घरगुती औषधी उपचार आहेत किंवा छोटी मोठी औषधे घेऊन सुध्दा आपण बरे होवू शकतो. ते प्रथम उपचार सुरु करा.
प्रश्नः आजारांची भीती वाटली तर काय करावे?
उत्तरः कोणताही आजार आला की प्रथमतः आपल्या जवळच्या ओळखीच्या फॅमिली डॉक्टर्सकडून उपचार सुरु करा व त्याच बरोबर घरगुती उपचार पण सुरु करा आणि बरे व्हा.
प्रश्नः उपचार सुरु करुन सुध्दा पेशंटची प्रकृती बिघडत असल्यास काय करावे?
उत्तरः पेशंटची प्रकृती फारच बिघडत असल्यास घरच्या नातेवाईकांनी घाबरुन सर्व हॉस्पिटलकडे पेशंटला घेवून फिरु नका. उगाच पेशंट गाडीमध्ये बसून घाबरुन जातो. तसे झाले तर नातेवाईकांनी प्रथम हॉस्पिटलमध्ये जाऊन बेडची व्यवस्था करुनच नंतर पेशंटला घेवून जावे.
प्रश्नः मास्कचा वापर करावा किंवा नाही? केंव्हा, कसा करावा?
उत्तरः जरुरीच्या ठिकाणीच मास्कचा वापर करावा. गरज नसताना मास्कचा वापर करु नका. कोणीतरी जवळ येणार असेल त्यावेळेलाच दोघांनी मास्क वापरावा. पेशंटनी तरी एकटे असताना मास्क अजीबात वापरु नका, नॅचरल ऑक्सीजनची आपल्या शरीराला खूप गरज आहे.
प्रश्नः मास्क वापरल्यास काय दुष्परिणाम होतात?
उत्तरः ऑक्सीजन पूर्ण मिळत नाही व आपण जो बाहेर सोडताना कार्बनडायऑक्साईड सोडतो तो मास्कमध्ये अडकतो व पुन्हा पुन्हा तेच तेच श्वासाव्दारे आत शरीरात जात राहते. म्हणून जास्त मास्क वापरु नये.
प्रश्नः आजार झाल्यावर किंवा आजार येण्याअगोदर काय करावे?
उत्तरः सुर्यस्नान, मोकळी हवा, गरम पाणी, गरम व ताजे जेवण, सी जीवनसत्वे असलेल्या भाज्या, फळे यांचा वापर रोजच्या जेवणामध्ये करा. तोंडाला चव येत नसेल तर डाळींबर चावून चावून खाल्याने चव लवकर येईल. गरम गरम टॉमेटोसुप, ताज्या भाज्या, कडधान्ये यांच्या सुपचा वापर जेवणाआधी करावा. खोकला असल्यास डाळींबाच्या फळाची साल तोंडात धरल्याने किंवा चावून रस घेतल्याने खोकला थांबतो. टोमॅटो, कांदा, लिंबू, कोशिंबीर व आमसोल कढी रोजच्या जेवणामध्ये ठेवा.
प्रश्नः सॅनिटायझर कितपत वापर करावा?
उत्तरः शक्मयतो सॅनिटायझर्सचा वापर कमी करुन साबणाने हात स्वच्छ ठेवल्यास उत्तम असेल. कुणाकडे जाताना व भेटून येताना सॅनिटायझरचा वापर करावा.
प्रश्नः स्टिम घ्याव का?
उत्तरः बाहेरुन घरी गेल्यावर पाच मिनीटे स्टिमरने गरम पाण्याची वाफ घ्यावी
प्रश्नःसकारात्मकता व विश्वास कसा ठेवावा?
उत्तरः आपण औषधे खाताना व जेवण करताना अशी भावना ठेवा की आपण घेतलेल्या औषधामुळे आणि जेवणामुळे माझा आजार दिवसेंदिवस बरा होत चालला आहे. कालच्यापेक्षा आज जास्त बरे वाटत आहे. सकाळपेक्षा आता जास्त बरे वाटत, दुपारच्यापेक्षा आता जास्त बरे वाटत आहे. आता मला छान झोप लागणार असा भाव ठेवावा.
प्रश्नः ऑक्सीजन वाढविण्यासाठी काय हलके फुलके प्रयोग सांगाल का?
उत्तरः आपण एकटे असताना आराम खुर्चीमध्ये आराम अवस्थेत किंवा गादीवर शांत डोळे मिटून श्वासोश्वासाकडे फक्त लक्ष ठेवा म्हणजे श्वास बेंबीपर्यंत खोलवर घेण्यास उपयुक्त होईल व ऑक्सीजनची क्षमता वाढेल आणि इतर प्राणयाम कपालभाती, अनूलोम, विलोम जमेल तर करावे,.
प्रश्नः कोरोना अगोदर कोणत्या वायरस किंवा रोगावर असा प्रयोग केला का?
उत्तरः 2004 साली सिव्हिल हॉस्पिटल एचआयव्ही झालेल्या रुग्णांवर हा प्रयोग झाला आहे. अनेक जण नकारात्मकतेत अडकले होते. व घाबरुन मृत्यू होत होता. अशा रुग्णांसाठी 3 दिवसांचे शिबिर घेतले होते. बऱयाच जणांनी त्यांचा फायदा झाला व फायदा झालेल्या रुग्णांनी पुढच्यांना सल्ला दिला. या शिबिरामधील कितीतरी लोक आज छान जीवन जगत आहेत.