आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा सकल्पेतून प्रोत्साहन
वाळपई/प्रतिनिधी
राजकारणातून समाजकारण करण्याचा नवा मंत्र आज जन्माला येऊ लागलेल्या आहे. पंच सभासद ते मंत्री महोदया पर्यंत आज राजकीय पुढारी राजकारण याच्या माध्यमातून समाजकारणावर मोठय़ा प्रमाणात भर देताना दिसत आहेत.. गोवा सरकारने यंदा आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना राबवून गोव्याला सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे वेगवेगळय़ा स्तरावर बैठका व उपक्रम राबवून आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पंच सभासद ते सरपंच आमदार मंत्री महोदय या कामाला युद्धपातळीवर जुडलेले आहेत. दुसऱयाना आवाहन व भाषणे देऊन उपदेश करण्यापूर्वी आपण जर एक नवा अध्याय व दुसऱयांना आदर्श करून देणारी कामगिरी केली तर स्वयंपूर्ण गोव्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. अशाच विचार भावनेतून सत्तरी तालुक्मयातील भिरोंडा पंचायतीचे सरपंच उदयसिंग राणे यांनी सध्यातरी मोठय़ा प्रमाणात भाजी लागवडीवर भर दिलेला आहे. सध्या अळंसादे तांबडी भाजी मुळा कॅबेज अशा प्रकारची भाजी उत्पादन करण्यावर भर दिला असून त्याने एक प्रकारचे चांगले उदाहरण इतरांसाठी घालून दिलेले आहे. सत्तरी तालुक्मयातील भिरोंडा पंचायत शेत्र म्हादई नदीच्या नजीक असलेला परिसर .पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे या भागातील अनेक जमिनी ओलिताखाली आलेले आहेत काही.काही जमिनी पडीग आहेत. मात्र या जमिनीत वेगवेगळय़ा प्रकारचे उत्पादन घेता येईल त्याच दृष्टिकोनातून एकाने वेगवेगळय़ा प्रकारची लागवड करण्यावर भर दिलेला आहे .
सरपंच उदयसिंग राणे यांनी यंदा मोठय़ा प्रमाणात कृषी क्षेत्रात पावले टाकत अशा प्रकारचे लागवड करण्यावर भर दिलेला आहे .यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधताना सांगितले की उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर जर आपण मातीच्या माध्यमातून वेगवेगळय़ा प्रकारच्या लागवड निर्माण करून घेण्यासाठी प्रयत्न केले तर चांगल्या प्रकारचे उदाहरण इतरांसाठी आपण घालून घेऊ शकतो. अशा प्रकारचा विचार मिळाला . आपण जवळपास एक एकर क्षेत्रामध्ये अंळसादे लागवड केलेली आहे .सत्तरी तालुक्मयातील जमीन अंळसादे ही लागवडीसाठी अत्यंत पोषक असल्याचे कृषी अधिकाऱयांचे म्हणणे आहे. त्या अनुषंगाने याठिकाणी लागवड केलेली आहे. आतापर्यंत चांगल्या प्रकारची लागवड उभारीला येत असून मोठय़ा प्रमाणात अंळसादे निर्मिती होण्याची आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. याची आवक प्रत्येकाच्या घरोघरी असते. यामुळे त्याला चांगल्या प्रकारचा दर्जा प्राप्त होऊन आपण केलेल्या लागवडीचा फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याच प्रमाणे तांबडी भाजी मुळा कॅबेज कोथंबीर अशा प्रकारची लागवड करण्यात आलेली आहे. मोठय़ा प्रमाणात भाजीचे उत्पादन करुन फलोत्पादन महामंडळाच्या खरेदी केंद्रावर त्याची विक्री करण्याच्या दृष्टीकोनातून येणाऱया काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. सत्तरी तालुक्मयातील प्रत्येकाकडे कमी-जास्त प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. मात्र या पाण्याचा वापर खऱयार्थाने आपल्या जमिनीत करून वेगवेगळय़ा प्रकारचे लागवड करण्यावर भर दिला तर गोवा भाजी त उत्पादनाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनणार आहे. यासाठी चांगल्या प्रकारे वाळपई विभागीय कृषी कार्यालयाकडून मदत प्राप्त झालेली आहे. विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस व त्यांचे सहकाऱयानी वेळोवेळी सहकार्य व प्रोत्साहन दिल्यामुळे आपण या लागवडीकडे विशेष रस दाखविला. महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात जमीन आहे. मात्र या जमिनीचा वापर खऱयार्थाने लागवडीच्या माध्यमातून करण्यासाठी कृषी अधिकारी दिलेले प्रोत्साहन येणाऱया काळातही आपल्या जीवनामध्ये वेगळय़ा प्रकारचे प्रोत्साहन मिळण्याच्या बाबतीत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सरपंच उदयसिंह राणे यांनी स्पष्ट केले आहे.