प्रतिनिधी /बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा गडकिल्ल्यांमुळे आजही जिवंत आहे. 18 व्या शतकापर्यंत हे गडकिल्ले सुस्थितीत होते. परंतु सध्या या किल्ल्यांची पडझड होत आहे. बेळगावचा भुईकोट किल्लाही याला अपवाद नाही. या भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी मागील तीन-चार वर्षे दुर्गसेवा बेळगावचे दुर्गसेवक झटत आहेत.
किल्ल्यांचे संवर्धन होणे हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य आहे. बेळगावच्या भुईकोट किल्ल्याची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली असून या किल्ल्याच्या संवर्धनासाठी दुर्गसेवा संघ पुढे आला. 2008 पासून राजहंसगडाचे कार्य करत असताना गेली तीन-चार वर्षे भुईकोट किल्ल्याचे संवर्धन केले जात आहे.प्रत्येक रविवारी दुर्गसेवक किल्ल्याच्या संवर्धनासाठी काम करत आहेत.