कोटय़वधी रुपयांची नुकसान : आगीचा तांडव विझविण्यासाठी सहा तास खडतर प्रयत्न,वाळपई, डिचोली, फोंडा, ओल्डगोवा अग्निशमन दलाच्या जवानांचे महत्त्वाचे योगदान
प्रतिनिधी /वाळपई
भुईपाल – सत्तरी येथील एसीजीएल कंपनीच्या विभागाला रविवारी मध्यरात्री आग लागल्यामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. अग्निशामक दलाच्या सहा बंबांचा वापर आग आटोक्मयात आणण्यासाठी करण्यात आला. सहा तासाच्या खडतर प्रयत्नानंतर आग विझविण्यात अग्निशामक दलाच्या यंत्रणेला यश आले. आगीचे निश्चित कारण अजूनपर्यंत समोर आले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या यंत्रणेने तातडीने धाव घेऊन आग विझवण्याची प्रक्रिया हाती घेतली नसती तर आगीचा फटका कंपनीच्या शेजारी असलेल्या अनेक प्रकल्पांना बसण्याची भीती होती.
एसीजीएल कंपनीच्या स्टोर भागाला रात्री 1 वा.च्या सुमारास आग लागल्याची माहिती वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेला मिळताच अग्निशामक दलाचे निरीक्षक संतोष गवस व इतरांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. आगीचा भडका एवढा प्रचंड होता की एका गाडीने आग विझविणे शक्मय झाले नाही. शेवटी वाळपई अग्निशामक दलाच्या अन्य दोन बंब, फोंडा, डिचोली व ओल्ड गोवा अग्निशामक दलाची एक बंब अशा सहा बंबच्या माध्यमातून सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्मयात आली. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे सदर आगीचा प्रकार सुरक्षारक्षकांच्या ध्यानात आला. यानंतर या संदर्भात माहिती वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेला देण्यात आली.
स्टोर विभागात आग, सर्व सामान जळून खाक
वाळपई पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱयांसह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आग विझविण्याच्या कामात महत्त्वाचे योगदान दिले. अग्निशामक दलाचे निरीक्षक संतोष गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 1 वा.च्या सुमारास आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाची यंत्रणा घटनास्थळी पोहोचली व त्यांनी आग विझवण्याची प्रक्रिया हाती घेतली. सदर आग एवढी प्रचंड होती की इतर बंबाची व्यवस्था करावी लागली. स्टोर विभागाचे सर्व सामान जळून खाक झाले असून इतर सामानाची मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या आगीमध्ये कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज संतोष गावस यांनी व्यक्त केला. नुकसानीचा निश्चित आकडा अजून पर्यंत स्पष्ट झालेला नाही.
कोटय़वधीची नुकसानी
एसीजीएल कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक दिलीप देसाई अधिकारी प्रकाश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्मयता वर्तवली. नुकसानीचा आकडा निश्चित सांगता येत नसला तरी कोटय़ावधी रुपयांच्या घरांमध्ये नुकसान होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. अशा प्रकारची घटना कंपनीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलेली आहे. वाळपई, डिचोली व ओल्ड गोवा फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी चांगल्या प्रकारचे योगदान दिल्यामुळे आग आटोक्मयात आणण्यास यश प्राप्त झाले. देसाई यांनी, अजून पर्यंत नुकसानीचा आकडा निश्चितपणे सांगता येत नसला तरीसुद्धा दोन दिवसांमध्ये या संदर्भात निश्चित आकडा स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान गेल्या काही वर्षापासून कोवीडच्या परिस्थितीमुळे कंपनीला अनेक स्तरावर नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे. आता हे प्रकरण घडल्यामुळे नो कंपनीला आणखीन नुकसान सहन करावे लागणार आहे. सध्या कंपनीचे व्यवस्थापन व कामगार यांच्या दरम्यानचा वाद सुरू आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी हा वाद अत्यंत शिकोपाला गेला होता. यामुळे कंपनीचे व्यवस्थापन व कामगार यांच्यामध्ये अजूनही समन्वय घडवून आलेला नाही. अशा अवस्थेत कंपनीला बऱयाच प्रमाणात अनेक स्तरावर दुष्परिणामांना सामोरे जावे लागलेले आहे. आता ही नवीन घटना घडल्यामुळे कंपनी समोर अनेक स्तरावर अडचणी निर्माण झालेल्या आहेत.