कचऱयावर उपाययोजना राबविली नसल्याने महापालिकेने घेतला निर्णय : एका कुंडीसाठी 3 लाख रुपये खर्च येणार
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. तरीदेखील नागरिक रस्त्याशेजारी आणि कचरा कुंडीशेजारी कचरा टाकून निघून जातात. परिणामी सर्वत्र दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरते. यावर पर्याय म्हणून महापालिकेने भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. फुटपाथखाली बसविण्यात येणाऱया कचराकुंडय़ांचा त्रास नागरिकांना आणि पादचाऱयांनाही होणार नसल्याने अशा प्रकारच्या भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया मागविण्यात आली आहे.
रस्त्याशेजारी किंवा कुंडीशेजारी कचरा टाकू नका तसेच गटारीत कचरा टाकण्याऐवजी घरोघरी येणाऱया स्वच्छता कामगारांकडे कचरा द्या, असे आवाहन महापालिकेकडून दररोज सकाळी न चुकता ऐकावयास मिळते. पण याकडे बेळगावकरांनी दुर्लक्षच केले आहे. स्वच्छतेसाठी महापालिकेकडून दर महिन्याला दोन कोटीहून अधिक निधी खर्च केला जातो. शहरातील रस्त्यांवर किंवा गटारींमध्ये कचरा टाकू नये, याकरिता महापालिकेने विविध उपक्रम राबविले आहेत. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्याची मोहीम सर्व वॉर्डमध्ये राबविण्यात येते. तरीदेखील बेळगाव शहरात काही ठराविक ठिकाणे कचऱयाच्या विळख्यात सापडली आहेत. घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करूनही नागरिक रस्त्याशेजारी किंवा कचराकुंडीशेजारी कचरा टाकून निघून जातात. सदर कचरा दुसऱया दिवशी सकाळपर्यंत पडून राहतो. परिणामी खाद्यपदार्थांच्या शोधात भटकी जनावरे आणि कुत्री टाकलेला कचरा इतरत्र पसरवतात. त्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरते. शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असल्याने रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरिता स्मार्ट बसथांबे, स्मार्ट पथदीप, दुभाजक आणि रस्त्याशेजारी फुटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. पण रस्त्याशेजारी टाकण्यात येणाऱया कचऱयावर कोणतीच उपाययोजना राबविण्यात आली नाही. त्यामुळे महानगरपालिकेने स्मार्ट कचराकुंडय़ा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील ब्लॅकस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱया कचराकुंडय़ांच्या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीच्या भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अत्याधुनिक आणि स्मार्ट पद्धतीच्या भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्यासाठी निविदा काढण्यात आली असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर एक डस्टबिन आणि कॉम्पॅक्टर घेण्यात येणार आहे. याकरिता महानगरपालिकेने निविदा मागविल्या आहेत. आतापर्यंत रस्त्यांवर दिसणाऱया कचराकुंडय़ा भूमिगत होणार आहेत. सदर स्मार्ट कचराकुंडय़ा फुटपाथ किंवा खुल्या जागेच्या ठिकाणी ठेवता येणे शक्मय आहे. फुटपाथच्या ठिकाणी जमिनीच्या खाली टाकी बांधून त्यामध्ये कचराकुंडय़ा ठेवण्यात येणार आहेत. त्यावर झाकण येणार असून, त्यावर केवळ कचरा टाकण्यासाठी लहान आकाराची पेटी असणार आहे. पाहणाऱयांना कचराकुंडी आहे असे अजिबात वाटणार नाही, अशा पद्धतीची कचराकुंडी महापालिका बसविणार आहे. कचराकुंडी खुली असल्याने घाण व दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे कचरा प्लास्टिक पिशवीमध्ये बांधून नागरिक लांबूनच टाकून निघून जातात. कचराकुंडीत पडला की बाजूला पडला याकडेदेखील लक्ष देत नाहीत. यावर उपाय म्हणून या नव्या कुंडय़ा बसविण्याचा विचार चालविला आहे. कुंडी जमिनीखाली असल्याने वरच्या बाजूला केवळ कचरा टाकण्यासाठी झाकण असलेला डबा असतो. झाकण उघडून त्यामध्ये कचरा टाकल्यामुळे आजुबाजुला कचरा पसरत नाही. दुर्गंधीदेखील पसरत नाही. कचराकुंडी भूमिगत असल्याने भटकी जनावरे किंवा कुत्र्यांचादेखील उपद्रव थांबणार आहे.
कॉम्पॅक्टरवर 3 टन क्षमतेची पेन असणार भूमिगत कचराकुंडीवर हायड्रॉलिक झाकण बसविण्यात येते. कचरा नेण्यासाठी विशेष कॉम्पॅक्टर बनविण्यात आला आहे. या कॉम्पॅक्टरवर 3 टन क्षमतेची पेन असणार आहे. या पेनच्या साहाय्याने भूमिगत असलेली कुंडी वर काढून त्यातील कचरा कॉम्पॅक्टरमधून नेता येतो. एका कुंडीसाठी 3 लाख रुपये खर्च येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर एका ठिकाणी भूमिगत कचराकुंडी बसविण्याचा प्रस्ताव आहे. सध्या एक कचराकुंडी आणि कॉम्पॅक्टरकरिता निविदा काढण्यात आली आहे. ही अत्याधुनिक भूमिगत कचराकुंडी प्रायोगिक तत्त्वावर टिळकवाडी परिसरात बसविण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात अशा 25 कचराकुंडय़ा दुसऱया टप्प्यात बसविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.