प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र सरकारने जो भू-सुधारणा कायदा केला आहे. तो शेतकऱयांवर अन्यायकारक आहे. त्या कायद्यामुळे शेतकऱयांच्या जमिनी नाहीशा होणार आहेत. त्यामुळे शेतकरी भूमीहीन होणार असून बेरोजगारी वाढणार आहे. तेंव्हा जाचक कायदा रद्द करावा, अशी मागणी करत शेतकऱयांनी सांबरा विमानतळावर आंदोलने केली. यावेळी दंडाला काळय़ा फिती बांधून मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला.
शेतकऱयांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर अमानुष लाठीमार केला जातो. सांबरा करण्यात आलेल्या आंदोलनावेळी शेतकरी आणि पोलिसांत झटापटी झाली. बेळगाव जिह्याच्या दौऱयावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शेतकऱयांनाही नुकसान भरपाई देण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. याकडे शेतकऱयांनी लक्ष वेधले. रस्त्यावर ठिय्या मांडून शेतकऱयांनी मुख्यमंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
शेतकऱयांमुळे देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे. मात्र आता शेतकऱयांच्यावरच केंद्र आणि राज्य सरकार अन्याय करत आहे, असाआरोप यावेळी करण्यात आला. शेतकऱयांच्या विरोधात जाचक कायदा करायचा आणि त्या कायद्याचा आधार घेत जमिनी काढुन घेण्याचा जो प्रकार सुरु आहे तो थांबवावा, याचबरोबर कायदाही कायदाही रद्द करावा, अशी मागणी यावेळी शेतकऱयांनी केली.