ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भ्रष्ट आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना सेवा कार्यकाळ समाप्तीपूर्वीच निवृत्ती देण्यात येणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्याचे आदेश केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने सर्व विभागांना दिले आहेत. 30 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या आणि 50 ते 55 वय असलेल्या कर्मचाऱ्यांचा आढावा घेण्यात येईल. त्यानुसार भ्रष्ट आणि कामचुकार कर्मचाऱ्यांना स्वेच्छा सेवानिवृत्ती घेण्यास सांगण्यात येणार आहे. अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे.
अपेक्षित काम न करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जनहिताच्या दृष्टीने निवृत्त करण्यात येईल. तसेच त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशीही करण्यात येणार आहे.