स्वच्छता करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष : नागरिकांतून तीव्र संताप
बेळगाव : मंगाईनगर-वडगाव या परिसरात गटारीचे पाणी साचून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याचबरोबर डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. या परिसरात चार ते पाच रुग्ण डेंग्यूचे आढळले आहेत. तेव्हा तातडीने स्वच्छता करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. महापालिकेने या नगराकडे दुर्लक्ष केले आहे. गटारींची साफसफाई केली जात नाही. त्यामुळे गटारीत पाणी साचून आहे. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. याचबरोबर डासही निर्माण झाले आहेत. त्यामुळे अनेक जण त्रस्त झाले आहेत. मात्र अजूनही या परिसराची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा तातडीने स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.