प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यात मोठमोठय़ा जिह्यांचं विभाजन, त्रिभाजन करुन नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे. मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिह्यांच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. या समितीच्या अहवालानुसार आता राज्यात नवे 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगड या मोठय़ा जिल्हय़ांचे विभाजन करून एक नवा जिल्हा अस्तित्वात येणार आहे. या प्रस्तावानुसार नव्या जिल्हय़ात मंडणगड तालुक्याचा समावेश होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिह्यांच्या निर्मितीच्या मागण्या या समितीसमोर ठेवण्यात आल्या होत्या. समितीने या मागण्यांचा अभ्यास केला. वित्त, महसूल, नियोजन विभागाचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे आणि 49 नवे तालुक्यांची निर्मितीबाबत अहवाल सादर केला आहे. मुंबईजवळच्या ठाणे जिह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण असे दोन नवे जिल्हे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिह्यातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. नाशिक जिह्यातून मालेगाव आणि कळवण जिह्याच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे.
लातूर जिह्यातील उदगीरला जिल्हा म्हणून मान्यता देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कर्नाटक सीमावर्ती भागाला लागून असलेला उदगीर तालुका हा शिक्षण, व्यापार आणि अन्नधान्याची बाजारपेठ यासाठी प्रसिद्ध आहे. उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी सातत्याने आंदोलन करण्यात आली आहेत.
कोणत्या जिह्यामधून कोणत्या जिह्याची निर्मितीचा प्रस्ताव?
ठाणे जिह्यातून- मीरा-भाईंदर आणि कल्याण
पालघर जिह्यातून जव्हार
रत्नागिरी जिह्यातून मंडणगड
रायगड जिह्यातून महाड
बुलडाणा जिह्यातून खामगाव
नाशिक जिह्यातून मालेगाव आणि कळवण
सातारा जिह्यातून माणदेश
पुणे जिह्यातून शिवनेरी
यवतमाळ जिह्यातून पुसद
अमरावती जिह्यातून अचलपूर
भंडारा जिह्यातून साकोली
चंद्रपूर जिह्यातून चिमूर
गडचिरोली जिह्यातून अहेरी
जळगाव जिह्यातून भुसावळ
लातूर जिह्यातून उदगीर
बीड जिह्यातून अंबेजोगाई
नांदेड जिह्यातून किनवट