ऑनलाईन टीम / मुंबई :
एकनाथ खडसे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही मंत्र्याचे पद जाणार नाही. तर मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही. जे आहेत ते तिथेच राहतील असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.
आज एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, आजचा दिवस फार आनंदाचा आहे. नाथाभाऊंनी राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत, असे म्हणत नाथाभाऊ काय चीज आहे तुम्हाला दाखवून देऊ. खडसेंचा अनुभव पक्षासाठी मोलाचा ठरेल आणि नाथाभाऊंच्या रूपाने आपली ताकद वाढेल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, अजित पवार नाराज असल्याची चर्चा मीडियाने दाखवली. पण यामध्ये कोणतेही तथ्य नाही.दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आला होता. त्यामुळे ते काळजी घेत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.