मंत्रिमंडळ विस्तारानंतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती असल्यामुळेच विलंब केला जात असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. युती सरकारच्या पतनाला कारणीभूत ठरलेल्या व सध्या भाजपमध्ये असलेल्या आमदारांना मंत्रिपद द्यावेच लागणार आहे. त्यांना मंत्रिपद देण्यासाठी भाजपमधील ज्ये÷ांना डावलावे लागणार आहे. त्यामुळे साहजिकच नाराजी उफाळणार आहे.
उडुपी येथील पेजावर मठाधीश श्री विश्वेशतीर्थ स्वामीजींचे महानिर्वाण झाले आहे. राज्य नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात असतानाच राष्ट्रसंताला मुकल्याच्या दुःखालाही सामोरे जावे लागले. सिद्धगंगा मठाचे डॉ. शिवकुमार स्वामीजींच्या महानिर्वाणाचे दुःख विसरण्याआधीच पेजावर मठाधीश काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या इच्छेनुसार बेंगळूर येथील पूर्णप्रज्ञा विद्यापीठाच्या आवारात ते वृंदावनस्थ झाले आहेत. श्रीराम मंदिर आंदोलन असो किंवा इतर कोणतेही उपक्रम असोत पेजावर मठाधीश नेहमी आघाडीवर असायचे. अनेक वेळा त्यांच्यावर टीका झाली. टीकेला उत्तर देत असतानाच जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. सर्वच पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची त्यांच्याकडे ये-जा असायची. समाज आणि सामाजिक जीवन अधिक शुद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी त्यांची ध्येयधोरणे ठरलेली असायची. सरत्या वर्षाने जाता जाता त्यांना आपल्यासोबत नेल्याने राज्याची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.
पेजावर मठाधीशांच्या जाण्याने शोकसागरात बुडालेल्या राज्याला आणि देशाला इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी एक दिलासादायक घोषणा केली आहे. चांद्रयान-3 योजनेची घोषणा झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने अनुमती दिली असून त्याची कामेही सुरू झाली आहेत. चालू वषी 25 उपग्रह अवकाशात सोडण्याचे इस्रोचे उद्दिष्ट आहे. 600 कोटी रु.चे चांद्रयान-3 पूर्ण व्हायला आणखी दीड वर्षांचा अवधी लागणार आहे. याचबरोबर चार अंतराळवीरांना रशियामध्ये प्रशिक्षण देऊन त्यांना अंतराळातील वास्तव्यासाठी पाठविले जाणार आहे. याचा फायदा भविष्यात चंद्रावर भारतीय वसाहत निर्माणासाठी होणार आहे. आजवर अमेरिका, चीन, रशिया या तीन राष्ट्रांनी अंतराळवीर पाठविण्याचे महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविले होते. दीड वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी या योजनेची घोषणा करून त्यासाठी दहा हजार कोटी राखीव ठेवले होते. आता या योजनेलाही चालना मिळाली असून त्यासाठीच्या तयारीला शास्त्रज्ञ लागले आहेत.
मुख्यमंत्री येडियुराप्पा स्वीत्झर्लंड दौऱयावर जाणार आहेत. त्यामुळे या महिन्यात होऊ घातलेले विधिमंडळ अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. 20 जानेवारीपासून दहा दिवस अधिवेशन होणार होते. मुख्यमंत्र्यांच्या विदेश दौऱयाच्या पार्श्वभूमीवर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता 17 ते 21 फेब्रुवारीपर्यंत विधिमंडळाचे अधिवेशन भरवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 2 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन भरविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 5 मार्च रोजी मुख्यमंत्री येडियुराप्पा कर्नाटकाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अधिवेशनाआधीच पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याबद्दल दबाव वाढला आहे. पोटनिवडणुकीचा निकाल लागून 9 जानेवारीला एक महिना पूर्ण होतो. खरेतर निकालानंतर आठवडाभरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, अशी अटकळ होती. मात्र, त्यासाठी उत्तरायणाची प्रतीक्षा केली जात आहे. मकर संक्रमणानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पुनर्रचना होणार आहे. 15 पैकी 13 विधानसभा मतदारसंघात भाजपला विजय मिळाला आहे. काँग्रेस-निजद युती सरकारच्या पतनासाठी कारणीभूत ठरलेल्या नेत्यांना मतदारांनी निवडून दिले आहे.
सध्या कर्नाटक मंत्रिमंडळात 16 मंत्रिपदे रिक्त आहेत. 13 नवनिर्वाचितांपैकी किमान 11 आमदारांना तरी मंत्रिपद द्यावे लागणार आहे. उर्वरित पाच मंत्रिपदे आपल्याच पक्षातील ज्ये÷ नेत्यांना देण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पुनर्रचना करणे निश्चितच कटकटीचे ठरणार आहे. काँग्रेस व निजदमधून भाजपमध्ये आलेल्या व पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर मंत्रिपदासाठी दबाव वाढविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱयानंतरच विस्तार किंवा पुनर्रचना होणार आहे. रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेल्या काँग्रेस-निजदमधील आमदारांना मंत्रिपदाची घाई आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती असल्यामुळेच विलंब केला जात असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. युती सरकारच्या पतनाला कारणीभूत ठरलेल्या व सध्या भाजपमध्ये असलेल्या आमदारांना मंत्रिपद द्यावेच लागणार आहे. त्यांना मंत्रिपद देण्यासाठी भाजपमधील ज्ये÷ांना डावलावे लागणार आहे. त्यामुळे साहजिकच नाराजी उफाळणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होताच रमेश जारकीहोळी यांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे. आपण भाजपचा आमदार आहे त्यामुळे साहजिकच आपल्यात पक्षनि÷ा आहे. वैयक्तिक नि÷sचा विचार झाला तर सिद्धरामय्या व मल्लिकार्जुन खर्गे हे आपले नेते आहेत, असे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळे तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत. आपण अजूनही कुंपणावर असून आपल्याला हवा असलेला मानसन्मान मिळाला नाही तर आपण केव्हाही दुसरीकडे उडी मारू शकतो, असेच त्यांनी सुचविल्याचे मानले जात आहे.