प्रतिनिधी /बेळगाव
किल्ला तलावाच्या आवारात बुडा कार्यालयानजीक सर्वात उंच तिरंगा फडकविण्याचे स्वप्न महापालिका प्रशासनाने साकार केले. पण तांत्रिक कारणांमुळे पावसाळय़ात उतरविण्यात आलेला तिरंगा पावसाळा संपल्यानंतरही फडकविण्यात आला नव्हता. मात्र, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमहोदयांच्या स्वागतासाठी देशातील सर्वात उंच तिरंगा फडकविण्यात आला आहे.
किल्ला तलाव आवारात सर्वात उंच तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. मात्र, हा ध्वज फडकविताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रारंभी वाऱयामुळे हा ध्वज फडकविण्यात अडचण निर्माण झाली होती. हा ध्वज खूपच उंच असल्याने बेळगावच्या हवामानाचा अडथळा निर्माण झाला आहे. ध्वजाची उभारणी झाल्यानंतर वाऱयामुळे ध्वज खराब झाला होता. कंत्राटदाराने तीन वेळा हा ध्वज बदलला होता. पण पावसाचे पाणी आणि वारा यामुळे ध्वज फडकविण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. पावसाच्या पाण्यामुळे ध्वजाचे वजन वाढले होते. परिणामी ध्वजस्तंभाला धोका निर्माण झाला. ध्वज खाली-वर करण्यासाठी बसविलेली यंत्रोपकरणे वजनामुळे निकामी झाली आहेत. त्यामुळे ध्वजाचा आकार लहान करून ध्वज फडकविण्यात आला होता. मात्र, ध्वज फडकविणाऱया यंत्राचे चाक खराब झाल्याने 26 जानेवारी दिवशीच हा ध्वज अर्ध्यावर थांबला होता. यंत्राच्या दुरुस्तीचे काम निघाल्याने ध्वज फडकविण्यात आला नाही.
सदर ध्वजस्तंभ उभारलेल्या कंत्राटदाराला याबाबत माहिती देण्यात आली. ध्वजाची देखरेख करण्याची जबाबदारी कंत्राटदाराकडे असल्याने हे चाक दुरुस्त करण्याची सूचना महापालिकेच्या अधिकाऱयांनी केली होती. त्यामुळे चाकाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र खराब हवामानामुळे ध्वज खराब होत असल्याने फडकविण्यात आला नाही. केवळ स्वातंत्र्यदिन आणि प्रजाकसत्ताक दिनानिमित्त ध्वज फडकविण्यात आला होता. मात्र, आता अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यातील आमदार बेळगावला येणार आहेत. त्यामुळे मंत्रिमहोदयाच्या स्वागतासाठी तिरंगा फडकविण्यात आला आहे.