वसई/प्रतिनिधी
केंद्रीय सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. आज जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका करण्याबरोबरच एक मोठा गौप्यस्फोटही केला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री आहेत. ते शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. जर एकनाथ शिंदे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे, असं राणे म्हणाले.
दम्यान, नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले होते. यांनतर शिवसेनेकडून स्मृती स्थळाचे शुद्धीकरण करण्यात आले. यासर्व प्रकारावर भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. आज जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी गोमूत्र शिंपडणाऱ्यांना हे माहिती नाही. गो मूत्रशिंपडत राहण्यापेक्षा रोजगार द्या. नको ते उद्योग करण्यापेक्षा हवे ते व्यवसाय करावे, असं म्हंटलं आहे. तसेच त्यांनी यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधताना राणेंनी एकनाथ शिंदे यांच्या विषयी मोठा दावा केला आहे.त्यांनी एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर त्यांचं स्वागत आहे, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावाही त्यांनी केला.