नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे हायड्रोजनवर आधारीत असणारे इंजिन बाजारात आणणार असल्याचे बोलत होते. ते काही जाहिर कार्यक्रमांमध्येही बोलत होते. याचा प्रत्यक्ष अनुभव बुधवारी आपल्या हायड्रोजनवर चालणारी कार टोयोटा मिराई या मॉडेलमधून मंत्री गडकरी यांनी सफर करुन सिद्ध केले, की फ्यूलचे भविष्य हायड्रोजनवरच निश्चित होणार आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आत्मनिर्भर बनण्यासाठी ग्रीन हायड्रोजन कारला सादर केले आहे. जी पाण्यावर चालणार आहे. प्रायोगिक पातळीवर हे सादरीकरण केले आहे. सध्या देशामध्ये ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीला सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये जास्तीत जास्त आयात कमी करत नवे रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
भारताचे ध्येय
भारत सरकारने 3000 कोटी रुपयाच्या मिशनला सुरुवात केली असून लवकरच हायड्रोजनची निर्यात आपला देश करणार आहे. देशात कोळशाचा वापर करण्यात येतो त्या ठिकाणी ग्रीन हायड्रोजनचा वापर केला जाणार असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
अन्य मुद्दे…
मंत्री गडकरी यांनी जानेवारीत
म्हटले होते लवकरच हायड्रोजनवरील कार धावणार
सदरच्या कारची निर्मिती जपानच्या टोयोटा कंपनीने केलीय
हायड्रोजन इंधन फरीदाबाद येथील इंडियन ऑईल पंपावरुन भरता येणार
फक्त पाच मिनिटात इंधन भरता येणार
एकदा टाकीत इंधन भरल्यानंतर 646 किमीपर्यंत कार धावू शकते