प्रतिनिधी / सोलापूर
वारकरी परंपरेमध्ये ” नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ | ” या न्यायाने नित्य नेमाला खूप मोठे महत्व असून तो नेम निष्ठेने साजरा केला जातो. या महिन्यात वारकरी मंडळी काकडा आरती करतात. त्यासाठी त्यांना स्वातंत्र्य पाहिजे. वारकरी भाविकांनी चैत्रवारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती,आषाढीवारी, श्रावण मास, अधिकमास, गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव घरात बसून साजरे केले. महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला सहकार्यच केले. परंतु सध्या बाजार पेठे सहित सर्व दुकाने खुली केली आहेत, कोणतेच क्षेत्र खुले करण्याचे राहिले नाही. रुग्ण संख्या ही कमी होत आहे.
म्हणजेच सर्व वातावरण मोकळे झाले आहे. म्हणून सुप्रसिद्ध मंदिर व इतर मंदिर असे दोन भाग करून नियमावली तयार करावी. नित्यनेम करणेसाठी महाराष्ट्रातील सर्व इतर मंदिर खुली करून सुप्रसिद्ध मंदिर टप्प्या टप्प्याने खुले करून कीर्तन, भजन व काकडा आरती करणेसाठी नियम व अटी घालून परवानगी लवकरात लवकर जाहीर करावी यासाठी जि. प. गेट समोर भजन आंदोलन करण्यात आले. याची नोंद घ्यावी असे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी अजित देशमुख यांना दिले. यावेळी सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष), बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), जोतिराम चांगभले (जिल्हा अध्यक्ष ), मोहन शेळके (जिल्हा सचिव आदी उपस्थित होते.
अन्यथा आझाद मैदान येथे आंदोलन केले जाईल – सुधाकर महाराज इंगळे
महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठा खुल्या आहे दुकान खुली आहेत. दारूचे दुकान मोठ्या प्रमाणामध्ये सुरु आहेत. सुरू करायचं काही शिल्लक राहिलेला नाही. नेते मंडळीने दसरा मेळावे साजरे केले. आम्हाला काकड आरतीला का बंद करण्यात येत आहेत असा प्रश्न आमच्यासमोर भाविकांनी समोर निर्माण होतो. आता आम्ही सोलापूर येथे आंदोलन केले आहे. आता तर परवानगी मिळाली नाही तर आम्ही मुंबई येथील आझाद मैदानावर पुढचे आंदोलन करणार आहोत.