महिलांनी केले तुळजाभवानी मंदिरासमोर तर पुरुषांनी आनंदवाडी दत्तमंदिरसमोर केले आंदोलन
प्रतिनिधी/ सातारा
मंदिरे बंद.. उघडे दारू बार.. अनागोंदी कारभार.. उद्धवा अजब तुझे सरकार अशा निषेधाचे फलक हातात धरत भाजपाच्यावतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ शंखनाद आंदोलन करण्यात आले. सातारा शहरात आनंदवाडी दत्त मंदिरासमोर आणि तुळजाभवानी मंदिरासमोर टाळ, घंटा व शंख वाजवून आंदोलन करण्यात आले.
चौथ्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि महिला मोर्च्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. सुवर्णाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, सातारा शहर सरचिटणीस प्रविण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, सौ. वैशाली टंगसाळे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे, महिला मोर्चा सातारा शहराध्यक्षा रीणा भणगे, सिनेकलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, सातारा शहर चिटणीस रवि आपटे, नगरसेवक सुनील काळेकर, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनीष महाडवाले, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संजय कासट, औद्योगिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल टंगसाळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे, महिला मोर्चा शहर सरचिटणीस हेमांगी जोशी, नेहा खैर, शहर उपाध्यक्ष कुंजबाला खंदारे, भटके-विमुक्त आघाडी महिला शहराध्यक्ष मनीषा जाधव, शुभांगी कवडे, आशा पंडित, योगिता पवार, किशोर पंडित पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करून ठेवली आहेत. मंदिरावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. सध्या महाराष्ट्रात सर्व काही व्यव्हार सुरुळीत चालू आहेत त्यात बाजारपेठ, दारुची दुकान, नेत्यांच्या सभा, इतर सर्वांना परवानगी आहे. शाळा सुद्धा चालू करण्याच्या तयारीत आहेत आणि फक्त मंदिर बंद आणि भजन किर्तनाला परवानगी नाही. मग मंदिर आणि धार्मिक कार्यक्रमातच कोरोनाची वाढ होते का हा प्रश्न आहे तरी मंदिर उघडावे व भजन किर्तनाला परवानगी द्यावी, मंदिरे खुली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.