मुंबई/ ऑनलाईन टीम
देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. तसेच बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्याचेह केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. एकीकडे केंद्र सरकारने ही भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे मात्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील दहवीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या भूमिकेवर भाजपकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
भाजप महाराष्ट्र या भाजपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. केंद्र सरकारने कोरोनाची परिस्थिती पाहता सीबीएससीच्या परीक्षा रद्द केल्या. राज्यातील मेडिकलच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मग दहावीच्या परिक्षांबाबत अजूनही गोंधळ माजवून का ठेवला आहे? वर्षा गायकवाड विद्यार्थ्यांच्या जीवाशी का खेळत आहात?, असा सवाल ट्वीटरच्या माध्यमातून भाजपकडून करण्यात आलेला आहे.
केंद्र सरकारने कोरोनाची परिस्थिती पाहता सीबीएससीच्या परीक्षा रद्द केल्या. राज्यातील मेडिकलच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मग दहावीच्या परिक्षांबाबत अजूनही सावळा गोंधळ माजवून का ठेवला आहे? वर्षा गायकवाड विद्यार्थ्यांच्या जीवाशी का खेळत आहात? असा सवाल भाजपकडून करण्यात आलेला आहे.