बेंगळूर :
राज्य सरकारने मच्छीमारांना कर्जमाफी योजनेंतर्गत 23 हजार जणांना 60 कोटी रुपये मंजूर केले आहे. राज्य अर्थखात्याने गुरुवारी याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे. मत्स्योद्योग आणि बंदरविकास मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी ही माहिती दिली. सदर रक्कम कर्जदार मच्छीमारांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. लॉकडाऊन कालावधीत देखील मच्छीमारांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी 60 कोटी रुपये मंजूर केल्याने कोटा श्रीनिवास पुजारी यांनी त्यांचे आभार मानले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कारवार, मंगळूर आणि उडुपी जिल्हय़ातील 23 हजार मच्छीमारांची कर्जे माफ होणार आहेत.