मटणाचे दर कमी न करता चढय़ा दरानेच विक्री : मटण खाणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्मयाबाहेर
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनच्या काळामध्ये बकऱयांचा तुटवडा असल्याचे भासवून मटण दुकानदारांनी मटणाचे दर वाढविले होते. मात्र, सध्या बकरी बाजार सुरू झाले असून बकरीही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत आहेत. मात्र, मटणाचे दर कमी न करता चढय़ा दरानेच मटणाची विक्री सुरू आहे. त्यामुळे मटणाचे दर गगनाला भिडले असून मटण खाणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्मयाबाहेर गेले आहे. तरी संबंधित खात्याने मटणाचे दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन काळामध्ये नागरिकांना दैनंदिन वस्तू मिळणे कठीण झाले होते. अशातच या संधीचा फायदा उठवत मटण दुकानदारांनी बकऱयांचा तुटवडा असल्याचे भासवले व मटणाचे दर अचानक वाढविले. शहरात 520 ते 550 रुपये असणारा दर 600 ते 640 रुपयांपर्यंत करण्यात आला. ग्रामीण भागामध्ये 480 ते 500 रुपये असणारा दर सरळ सरळ 600 रुपये करण्यात आला. सध्या सर्व बकऱयांचे बाजार सुरळीतपणे सुरू असून बकरीही मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मटणाचे दर कमी करणे गरजेचे होते. मात्र, मटणाची चढय़ा दरानेच विक्री सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री बसत आहे. बाजारपेठेत सध्या एखाद्या वस्तुचा दर वाढला की तो कमी करण्याचे कोणी नावच घेत नाही. असाच प्रकार सध्या मटणाच्या बाबतीतही सुरू आहे.
मनपा व ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज
बेळगाव शहर परिसरात महानगरपालिकेने मटणाचा दर ठरवून तो कमी करावा. मटणाचे दर कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही आवाज उठवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तालुक्मयातील ग्रामपंचायतींनीही ग्रामपंचायतीत ठराव घालून मटणाचा दर कमी करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अलीकडेच तालुक्मयातील ग्रा. पं. ची निवडणूक होऊन नवीन ग्राम पंचायत अस्तित्वात आली आहे. त्यामुळे नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत आवाज उठवून मटणाचे दर आटोक्मयात आणावेत आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली
आहे.
मटणाचा दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांची पावले आता चिकन खरेदीकडे वळली आहेत. सद्या मटणाचे दर असेच वाढत राहिले तर एक दिवस सर्वसामान्यांच्या ताटातून मटण गायब होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मटणाचा दर कोल्हापुरात कमी तर बेळगावात अधिक
बेळगावनजीकच्या कोल्हापूरमध्ये मोठय़ा प्रमाणावर मटणाची खरेदी केली जाते. तेथील तांबडा व पांढरा रस्सा प्रसिद्ध आहे. मात्र, कोल्हापूर शहरामध्ये मटणाचा दर कमी असून त्यापेक्षा जास्त बेळगाव शहरामध्ये मटणाचा दर आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या धर्तीवर बेळगावातही मटणाचा दर कमी करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कोल्हापुरात मटणाचा दर कमी करण्यासाठी सामान्य लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी लोकांनी मटणाचा योग्य दर ठरविला होता. त्याप्रमाणेच बेळगाव येथेही मटणाचे दर आटोक्मयात आणावेत, अशी मागणी होत आहे.