साहित्यः अर्धा किलो बासमती तांदूळ, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा तेल, मीठ, मॅरीनेटः अर्धा किलो मटण, पाऊण वाटी दही, 3 हिरव्या मिरच्या चिरून, मीठ, 1 चमचा लाल तिखट, पाणी, इतरः 5 चमचे तेल, 2 कांदे चिरून, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 4 हिरव्या मिरच्या चिरून, पाव वाटी कोथिंबीर चिरून, 4 चमचे पुदिना चिरून, चिमुटभर केशरकाडय़ा, चिमुटभर खाण्याचा रंग, मीठ, खडा मसालाः 1 चमचा जिरं, 4 काळीमिरी, 3 लवंग, 3 वेलची, 2 इंच दालचिनी, 2 तमालपत्र, 1 चक्रीफूल.
कृतीः कुकरमध्ये मटण, मीठ, हिरवी मिरची, दही आणि वाटीभर पाणी ओतून 3 ते 4 शिट्टय़ा घ्याव्यात. चमचाभर कोमट दुधात केशरकाडय़ा व खाण्याचा रंग मिक्स करावा. तांदूळ अर्धा तास भिजत ठेवून निथळावेत. पाण्याला उकळी काढून त्यात जिरं, मीठ आणि चमचाभर तेल टाकावे. नंतर तांदूळ टाकून 7 ते 8 मिनिटे अर्धाकच्चा शिजवावा. जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून त्यात खडा मसाला, कांदा आणि हिरवी मिरची टाकून परतवावे. नंतर आलं-लसूण पेस्ट टाकावी. आता त्यात फक्त शिजलेले मटण आणि लाल तिखट मिक्स करून मिश्रण शिजवावे. नंतर मटण ग्रेव्ही घालावी. त्यावर थोडी पुदिना व कोथिंबीर टाकावी. आता शिजलेला तांदूळ, पुदिना व कोथिंबीर टाकावी. वरून केशर व खाण्याचा रंग टाकून झाकण ठेवून मध्यम आचेवर 15 मिनिटे तर 10 मिनिटे मंद आचेवर ठेवावे. गार झाले की सलादसोबत खाण्यास द्या.