प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरात मटणदरावरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. खाटीक समाज संघटनेचे पदाधिकारी आणि कृती समितीचे पदाधिकारी यांच्या बैठकीत 520 रुपये किलो दराने मटणाची विक्री करण्यावर एकमत झाले. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून होणार आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱयांकडून तपासलेले बकरे (शिक्का मारलेले) कापून स्वच्छ मटण देण्याचे मान्य करत मटणविक्रेत्यांनी आपले विक्रीबंद आंदोलनही मागे घेत असल्याची घोषणा केली.
मटणदराचा प्रती किलो दर 580 ते 600 पर्यंत पोहचल्यानंतर त्याला आक्षेप घेत कसबा बावडय़ात विरोधाची ठिणगी पडली होती. त्याचे लोण शहरात पसरले. 480 रूपये किलो दराने मटण विक्रीची मागणी जोर धरू लागली. शिवाजी पेठेतील बैठकीत 480 रूपये दर ठरला होता; पण शहरातील मटणविक्रेत्यांनी हा दर परवडत नसल्याचे सांगतले होते. त्यातून मटणविक्रेते आणि सर्व पक्षीय समितीत संघर्ष सुरू झाला होता. मटणविक्रेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत गेली तेरा दिवस शहरातील मटणविक्री पूर्णपणे बंद ठेवत मटण मार्केटमध्ये धरणे आंदोलन सुरू केले होते. शहरातील मटण दुकाने बंद राहिल्याने जवळपास अडीच ते पावणे तीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. आता तोडगा निघाल्याने मंगळवार 14 जानेवारीपासून शहरातील मटणदुकाने सुरू होणार आहेत.
सोमवारी मटणविक्रेते आणि सर्व पक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली. यामध्ये मटणविपेत्यांच्या वतीने खाटीक समाजाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी सध्या बकऱयाच्या बाजारात असलेली स्थिती, मटणविक्री करताना येणाऱया अडचणी, परवडणारा दर याविषयी सविस्तर माहिती दिली. किलोला 520 रुपये दर मटणविपेत्यांना परवडत असल्याचे सांगितले. तसेच बकरे कापण्यापूर्वी ते महापालिकेच्या पशूवैद्यकीय अधिकाऱयांकडून तपासून घेतले जाईल. स्टॅपिंग केले स्वच्छ मटण देण्याची ग्वाही यावेळी मटण विक्रेत्यांकडून देण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते 520 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला.
बैठकीला खाटीक समाजाच्या वतीने सुनील सलगर, विजय कांबळे, धनाजी कोतमिरे, बाळासाहेब जाधव, जयदीप घोटणे, दत्तात्रय इंगवले, शिवाजी घोटणे, किरण कोतमिरे, चंद्रकांत कोतमिरे, प्रकाश प्रभावळकर, अजिज खाटीक, सुनील कांबळे, दशरथ पलंगे, याकुब चौधरी, इम्रान खाटीक, शब्बीर खाटीक, राजू शेळके, महेश घोडके, शैलेश घोटणे, सलीम गाडीवान, हबीब गाडीवान, प्रकाश काळे, चंद्रकांत भोपळे, रविंद्र प्रभावळे, विजय प्रभावळे, अमोल कांबळे, अस्लम खाटीक, अजय ताडे, संजय इंगवले, सुजित प्रभावळे उपस्थित होते. तर कृती समितीच्या वतीने निमंत्रक आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, महेश जाधव, बाबा पार्टे, सुजित चव्हाण, नगरसेवक अजित राऊत, शिवाजीराव जाधव, ऍड. बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, चंद्रकांत यादव, विनायक फाळके, दुर्गेश लिंग्रस, नितीन पाटील, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, विजयसिंह बंटी पाटील, अशोक भंडारे, सुनील देसाई, सुनील खिरूगडे, कुमार खोराटे, अविनाश पाटील, संदीप घाटगे, संजयकाका जाधव, किशोर घाटगे, संजय कुऱहाडे, सुनील पाटील, शशिकांत शेटके, श्रीकांत भोसले आदी उपस्थित होते.