प्रतिनिधी /मडगाव
मडगावच्या उल्हास ज्वेलर्सच्या वतीने विद्यानगर-मडगाव येथे रोपे लावून वन महोत्सव साजरा करण्यात आला. जंगलांचे संरक्षण करण्यासाठी आणि अधिकाधिक झाडे वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण जागरूकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण कर्मचाऱयांनी फळ देणारी रोपे लावली.
उल्हास ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम वेर्लेकर यांनी गोव्याचे पर्यावरण जतन करण्याच्या संदर्भात् आपले विचार व्यक्त केले. ‘आपल्या संसाधनांच्या संवर्धनात प्रगती हातात घेण्याची गरज आहे. आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे आणि झाडे लावणे हे आपले प्रत्येक कर्तव्य आहे जेणेकरून भविष्यातील पिढय़ांना अधिक हरित गोवा मिळू शकेल. असे ते म्हणाले.
उल्हास ज्वेलर्सने त्यांच्या मडगाव मधील शो-रूममध्ये भेट देणाऱया ग्राहकांना झाडे भेटवस्तू म्हणून दिल्या व त्यांना वन महोत्सवाचे महत्त्व व वने संरक्षित करण्याची आवश्यकता विशद केली. त्यांनी ग्राहकांना अधिकाधिक झाडे लावण्यास आणि संसाधनांचे संवर्धन करण्यास प्रोत्साहित केले. गोव्यातील सर्वाधिक आवडते ज्वेलर्स, उल्हास ज्वेलर्स शाश्वत विकासावर विश्वास ठेवतात आणि गोव्याचा वारसा, संस्कृती आणि पर्यावरण व्यवस्था जपण्यासाठी नियमितपणे हातभार लावत आहेत. वर्षानुवर्षे सामाजिक आणि पर्यावरणीय कारणांवर जागरूकता पसरविण्यासाठी त्यांनी विविध मोहिमे आयोजित करण्यात मोलाचे योगदान दिले आहे.