प्रतिनिधी / मडगाव
मडगाव नगरपालिकेची निवडणूक आज शुक्रवारी होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपले व्हायब्रंट मडगाव पॅनल निवडणुकींच्या रिंगणात आणले आहे. या पॅनलचे प्रमुख म्हणून प्रदेश भाजपचे सरचिटणीस दामोदर (दामू) नाईक हे कार्यरत आहेत. त्यांच्याशी साधलेला हा संवाद…
मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीकडे कशा प्रकारे पाहता ?
ही निवडणूक म्हणजे लोकांचं आपल्या शहराबद्दल असलेले स्वप्नं आणि लोकप्रतिनिधीनीं केलेली फटिंगपणा याचा मिलाफ आहे. गेल्या पाच वर्षात पूर्ण बहुमत नगरपालिकेवर गोवा फॉरवर्डचे वर्चस्व आहे. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड एकूण 15 वर्षे निर्विवाद सत्ता गाजवली. पण, मुलभूत सुविधा आणि नियोजनात पूर्ण अपयश आले.
यावेळी प्रमुख मुद्दे कुठले आहेत ?
सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्प – सालीगांव-कळगुंट इथे भाजपच्या सरकारने आशिया खंडातील एक सुदर असा प्रकल्प आणून प्रत्यक्षात साकार करून दाखविला. पण, मडगाव शहराला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहूनही विजय सरदेसाई असा प्रकल्प आणण्यात अपयशी ठरले. 2002 ते 2012 पर्यंत आपण आमदार होतो. 2010-12 फोमेन्तोकडे प्रकल्पासाठी करार केला. मला कुठल्याही बैठकीला किंवा चर्चेला न बोलवता तेव्हाचे मुख्यमंत्री, नगर नियोजन संस्था किंवा नगरपालिका यांनी कधीही विश्वासात न घेता हा प्रकल्प पुढे नेला. आपण कुठल्याही बैठकीला उपस्थितीत होतो किंवा बैठकीचा इतिवृत्तात दाखवावा असे जाहीर आव्हान मी देतो. वास्तविक आपण विधानसभेत कित्येकवेळा हय़ावर बोललो. मी सोनसोडय़ा शेजारीच राहतो. हय़ाबद्दल आमदारांनी आधी माहिती करून घ्यावी नंतरच बोलावे.
फातोडर्य़ाबद्दल आमदार विकासकामावर बोलतात त्याचं काय ?
रस्ते डांबरीकरण म्हणजे विकास नव्हे, ता हक्क आहे. पाणी, वीज, रस्ते हे सर्व नगरसेवक, पंच, सरपंच हे सगळेच करतात. पण, आपल्या शहरात आपल्या लोकांसाठी एखादा समाजपयोगी प्रकल्प आणणे किंवा उभारणे हय़ाला महत्व आहे. प्रत्येक राजकारणी आमदार एखादा महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या शहरात मतदारसंघात आणतोच. पण, गेल्या साडेनऊ वर्षात विजय सरदेसाईने सरकारात मंत्री, उपमुख्यमंत्री असताना किंवा विरोधी आमदार असताना आणला ते दाखवावे.
मी 2002 ते 2012 पर्यंत आमदार होतो. मनोहर पर्रीकर, प्रतापसिंह राणे आणि दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना, सत्तेत आणि विरोधी पक्षात होतो, पण फातोर्डा मतदारसंघाचा विकास करण्यात मी कधीही आडकाठी किंवा प्रतारणा केली नाही. माझ्या कारर्किदीत घोगळ येथे गणपती विसर्जन तळी, दवंडो येथील पूल, रवींद भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन जिल्हा इस्पितळ, बोर्डा येथील मल्टिपर्पज कॉलेज सभागृह, मल्टिपर्पज स्पोटर्स कॉम्लेक्स, घाऊक मासळी मार्केट, एसजीपीडीए दुसरे टप्प्यातील काम, वीज खांबावरील वीज वाहिन्या काढून टय़ूबलर पोल्सची उभारणी, भूमिगत वीज वाहिन्या, मलनिस्सारण योजना, पाणी पुरवठा, रस्ते डांबरीकरण, प्रमुख 7 नाल्याचे रूदीकरण करण्यात आले तसेच सात कल्वर्हटचे काम इत्यादी समाजपयोगी कामे केली. आर्लेम ते रवींद्र भवन असा रस्त्यासाठी (आत्ता सुदर दिसतोय) भूसंपादन प्रक्रिया 2006 साली सुरू झाली. त्यासाठी सेक्शन 4, 6, 11 पूर्ण झाले आणि 2012 मध्ये जागा ताब्यात मिळाली. आत्ता तिथे डांबर घालून श्रेय घेणारा आमदार आहे.
हे पालिका मंडळ महत्वाचे का आहे ?
पालिका कायद्यात मध्ये सर्व अंर्तभूत आहे. साधन सुविधा, आरोग्य सुविधा, पालिका क्षेत्राचे नियोजन, विकासकामे इत्यादीचा समावेश आहे. पण, नगरसेवक म्हणजे गटारावर लाद्या घालणे व चिल्लर कामे करणे पसंत करतात. गोवा फॉरवर्डने 2015 साली जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली आणि निवडणूक जिंकली. पण, जाहीरनामा आज पर्यत साध्य का नाही केला ? सरकार, पीडीए, पोलीस, सर्वकाही गोवा फॉरवर्डने केल्याचे बोलणाऱया विजय सरदेसाईनी हे सर्व किती प्रमाणा केले, किती जणांना रोजगार उलपब्ध केला ते ही सांगावे.
मडगावच्या प्रमुख समस्या का नाही सोडवल्यात ?
कुंकळळी, काणकोण, शिरोडा अशा उपशहरामध्ये बस स्थानक झालेत. मग राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मडगावचा बस स्थानक का नाही झाला ? किंवा पायाभरणी सुद्धा करता आली नाही का ? बाकीचे मंत्री-आमदार प्रकल्प साकारत असताना इथेच का नाही ? 16 बी किंवा टाऊन कंट्री खात्याद्वारे जाग्याचे रूपांतर स्वताच्या फायदय़ासाठी करणाऱया मंत्र्याला का नाही जमलं. ?
सरकारच्या योजना तुम्ही लाकांपर्यंत पोहचविता का ?
हो. 2002 साली मी आमदार नव्हतो, आत्ता ही नाही. माझं पालिका मंडळ नव्हते, त्यावेळी माझं सरकार होतं. मनोहर पर्रीकर यांनी गृहआधार, लाडली लक्ष्मी, दिनदयाळ स्वास्थ योजना अशा अनेक योजना दिल्या. त्या सर्व मी लोकांच्या दारी पोहोचवण्याची आत्ताही सेवा म्हणून करतोय. कोरोना महामारीच्या काळात लोकांना शक्य तेव्हढा मदतीचा हात दिला. विविध भागात व इमारतीमध्ये सेनिटायझेशन, भाजीपाल्याचा पुरवठा, मास्क वितरण, कडधान्य, औषधे, गोळय़ा पुरविल्या. या सर्व गोष्टी लोकांना माहित आहेत.
पुढे काय ? फॉर्मेलिन घालून लोकांच्या जीवाशी खेळणारे, फोट फटींगपणा करून लोकांना उल्लू बनवणे, भ्रष्टाचार करणे, स्टेज मॅनेमेंट करून स्वताची प्रसिद्धी करणे स्वताचे घर आणि मळकर्णे येथल हवेली किंवा गोंयकार घर, यु टर्न करणे, आपलाच शब्द फिरविणे आणि राजकारात आलेला कीळसवाणा प्रकार बंद झाला पाहिजे त्यासाठी लोकाचं सहकार्य मळेल अशी अपेक्षा करून इक चांगल मॉडेल शहर बनविण्यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्वाच्या आशीवार्दाने पुढे वाटचाल करतोय.