ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. बुधवारी पहाटे 3.32 मिनिटांनी हा भूकंप झाला.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 10 किलो मीटर खोल अंतरावर होते.
याआधी 1 सप्टेंबरला देखील मणिपूरमधील उखरुलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टल स्केल एवढी होती.