प्रतिनिधी / साटेली-भेडशी:
दोडामार्ग-बांदा राज्य मार्गावरील मणेरी येथील पुलाचा संरक्षक कठडा कोसळल्याने त्या ठिकाणी सुक्या झाडांच्या फांद्यांचा आधार दिला. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होते आहे.
या मणेरी पुलावरून नियमित वाहतूक सुरू असते. दोडामार्ग-बांदा-सावंतवाडी यांना जोडणारा महत्वाचा राज्यमार्ग असून याच राज्यमार्गावर हा तिलारी नदीवर मणेरी पूल आहे. पुलाचे संरक्षक कठडे कोसळल्याने एकाचवेळी अपघात घडण्याची शक्मयता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा उपयोगाचा नाही. हाच हलगर्जीपणा वाहनचालकांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित जागे होऊन संरक्षक कठडय़ाची व्यवस्था करण्याची मागणी वाहनधरक व नागरिकांमधून होत आहे.