निकृष्ट दर्जाचे काम, काही ठिकाणच्या अर्धवट कामामुळे नागरिकांत नाराजी : संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी
वार्ताहर /हिंडलगा
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मण्णूर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वरि÷ अधिकाऱयांनी त्वरित कामाची पाहणी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या उचगावपासून मण्णूर गावच्या मार्कंडेय नदिकाठच्या बंधाऱयापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. ठिकठिकाणी डांबर अर्धवट घालण्यात आल्यामुळे सुसाट धावणाऱया वाहनांना चांगलाच हादरा बसत आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील अर्धवट सोडून गेलेल्या ठिकाणी अद्यापही डांबर घालण्यात आले नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याशिवाय मार्कंडेय नदीकाठच्या बंधाऱयाजवळचा रस्ता तसाच सोडून देण्यात आला आहे. रस्त्याच्या मध्यभागी मातीचे ढिगारे टाकल्याने रात्रीच्यावेळी लहान मोठे अपघात होत आहेत.
रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूनी कमीत कमी तीन फूट बाजूपट्टय़ा ठेवण्याची गरज आहे. पण सदर कंत्राटदाराने नियम धाब्यावर बसवून काही ठिकाणी केवळ एक फूट बाजूपट्टय़ा सोडल्या आहेत. त्यामुळे एखाद्या वाहनाने आपले वाहन थोडे जरी रस्त्याकडेला घेतले तरी ते थेट शिवारात कोसळण्याची दाट शक्मयता आहे. तसेच पावसाळय़ात पुन्हा रस्ता खचण्याची भीती व्यक्त होत आहे. याबरोबरच सध्या रस्ता खचू नये, म्हणून रस्त्याकडेला दगडी बांधकाम केले जात आहे.
यासाठीदेखील उत्तम दर्जाचे दगड वापरण्याची गरज आहे. पण संबंधित कंत्राटदार साधे भरावाचे दगड वापरून अशास्त्रीय पद्धतीने काम करत आहे. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे देखील याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून देखील गेल्या दोन वर्षांपासून कंत्राटदाराने रडतखडत काम संपविण्यासाठी आटापिटा सुरू ठेवला आहे. पण कामावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने कंत्राटदाराचे चांगलेच फावले असून मण्णूर व गोजगे ग्रामस्थांसह परिसरातील वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय लोकप्रतिनिधी व बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी त्वरित पाहणी करून कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गतिरोधक घालण्याची मागणी
सध्या गोजगेपासून मण्णूर ते मार्कंडेय नदीकाठच्या बंधाऱयापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने वाहने सुसाट धावत आहेत. शिवाय परिसरात असलेल्या दगडांच्या खाणीतून खडी वाहतूक करणाऱया अवजड वाहनांचीदेखील मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. परिणामी अपघात होण्याची शक्मयता असल्याने रस्त्यावर तीन ते चार ठिकाणच्या वळणाजवळ गतिरोधक घालण्याची मागणी होत आहे.