ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशभरात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. उत्तर प्रदेशसह गोव्यामध्ये शिवसेना निवडणूक लढवत आहे. शिवसेनेनं यंदा गोव्यामध्ये ११ जागी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय समीकरणं देखील नव्याने मांडली जाऊ लागली आहेत. गोवा निवडणुकांसाठी सध्या आदित्य ठाकरे प्रचार करण्यासाठी गोव्यात असून त्यांनी देखील भाजपावर तीव्र टीका सुरू केली आहे. आज पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांनी मला मतदारसेघात प्रचाराला येऊ नका असे फोन आले असं म्हटल आहे.
गोव्यात आज संध्याकाळी निवडणूक प्रचाराची सांगता होणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीला मतदान पार पडत आहे. त्याआधी राजकीय घडामोडींना वेग आलाय. विविध पक्षांचे राजकीय नेते आज गोव्यात दाखल झाले आहेत. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा गोव्यासंदर्भातील मास्टर प्लॅन सांगिलता. यावेळी संजय राऊत हे देखील उपस्थित होते. राऊत यांनी गोव्याच्या विकासाबद्दल माहिती दिली. तर आदित्य ठाकरे यांनी ११ उमेदवारांसाठी जनतेला मत देण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. मला मतदारसंघात प्रचाराला येऊ नका, असे फोन आले आहेत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. राजकीय प्रोटोकॉल असतात, असं ते म्हणाले.