पश्चिम बंगालमध्ये 80, आसाममध्ये 72 टक्के- विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान
गुवाहाटी, कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यातील 77 जागांवर शनिवारी पहिल्या टप्प्यासाठी मतदान झाले. यामध्ये पश्चिम बंगालच्या 30 आणि आसाममधील 47 जागांचा समावेश आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानंतर बंगालमध्ये जवळपास 80 टक्के तर आसाममध्ये 72.14 टक्के मतदानाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक अधिकाऱयांकडून देण्यात आली. एकंदर दोन्ही राज्यांत मतदारांमध्ये बऱयापैकी उत्साह दिसून येत होता. काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुपारी 3 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 55.27 टक्के आणि आसाममध्ये 47.10 टक्के मतदान झाले. मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालले. कोरोनामुळे मतदानाचा कालावधी एका तासाने वाढवण्यात आला होता. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 73 लाख मतदारांनी 191 उमेदवारांचे भवितव्य निश्चित केले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत जवळपास 80 टक्के मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपले मत दिले. काही ठिकाणी मतदान यंत्रांमधील तांत्रिक बिघाडामुळे मतदारांना काहीवेळ प्रतीक्षा करावी लागली.
शनिवारी पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानापैकी अनेक जागा या पूर्वीच्या नक्षलग्रस्त असलेल्या जंगमहल प्रदेशातील आहेत. त्यामुळे या भागात सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली होती. या भागातील मतदानावर अनेक पक्षांचे तसेच निवडणूक आयोगाचेही बारीक लक्ष होते. भाजपला या परिसरातून चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे. 2019 मध्ये झालेल्या या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला येथे चांगले यश मिळाले होते.
विक्रमी मतदानाचा फायदा कोणाला?
ओपिनियन पोलमध्ये भाजप आणि टीएमसी यांच्यात ‘काँटे की टक्कर’ होणार असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले होते. अशा परिस्थितीत इतक्मया मोठय़ा संख्येने मतदान झाल्याने वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होणार? ममता पुनरागमन करतील की भाजप राज्यात ऐतिहासिक विजयोत्सव साजरा करेल? अशा वेगवेगळय़ा चर्चांना ऊत आला आहे. वास्तविक पाहता जास्त मतदानाची टक्केवारी सामान्यपणे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जनमत म्हणून पाहिले जाते. बऱयाचवेळा हा सिद्धांतही योग्य सिद्ध झाला आहे. तथापि बंगालच्या बाबतीत हा सिद्धांत बऱयाचवेळा चुकीचा सिद्ध झाला आहे.
ममतांचा मोदींवर निशाणा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी खडगपूरमधील प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. निवडणुकींदरम्यान पंतप्रधान बांगलादेशात गेल्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा दावा करत आपण याप्रश्नी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. दुसरीकडे पुरुलियामध्ये तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने मतदारांना पैसे वाटल्याची तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मतदानाच्या पूर्वसंध्येला हल्लासत्र
पूर्व मिदनापूरच्या भगवानपूर विधानसभा परिसराच्या सतसतमलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये दोन सुरक्षादलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. भाजपचे जिल्हा अध्यक्ष अनूप चक्रवर्तींनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. तसेच पश्चिम मिदनापूरच्या सालबोनीमध्ये माकप उमेदवार सुशांत घोष यांच्यावर हल्ला झाल्याचेही सांगण्यात आले.