प्रतिनिधी /पणजी
माझ्या विरोधात कोण आहे याची फ्ढिकीर करत नाही आणि त्याची गरजही मला नाही. मतदारांवर आपला पूर्ण विश्वास असून ते भरघोस मतांनी निवडून देतील, अशी खात्री पणजीचे भाजपाचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी प्रकट केली.
पणजीत प्रचार करताना मोन्सेरात बोलत होते. बोक-द-व्हॉक या परिसरात त्यांनी घरोघरी भेटी देवून मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच मतदारांना भाजपाला विजयी करा असे आवाहन केले.
मोन्सेरात यांचे ठिकठिकाणी पारंपारीक पध्दतीने स्वागत करण्यात आले. तर अनेक ठिकाणी त्यांना महिलांनी ओवाळले. तरूण नवीन मतदरांशी देखील त्यांनी संवाद साधला.
मोन्सेरात म्हणाले, की गेल्या दोन दशकापासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करीत असून आपला दबदबा लोकांना माहित आहे. आपल्या विरोधात कोण उभा आहे याचा विचार मी करीत नाही व कोणी असला तरी मला फ्ढरक पडत नाही. आपली बांधिलकी मतदारांशी असून ते भरघोस मतांनी विजयी करतील अशी आश मोन्सेरात यांनी प्रकट केली.
भाजपाने मार्गदर्शक कारभारातून विकास केला असून गेल्या 10 वर्षात पणजीत खूप बदल झाले आहेत. स्मार्ट सिटी म्हणून अनेक विकासकामे झाली आहेत. काही अपूर्ण असलेली कामे पूर्ण होण्यासाठी निवडून द्यावे, असे मोन्सेरात यांनी नमुद केले.
पणजी संपूर्ण मतदारसंघ यापूर्वीचा पिंजून काढला असून निवडणूक 3 आठवडय़ावर आली असल्याने पुन्हा एकदा मतदारांशी संपर्क साधत असल्याचे मोन्सेरात यांनी सांगितले. फ्ढटाक्यांची आतषबाजी करत ‘मोन्सेरात तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.