उदगाव / वार्ताहर
शेतामध्ये मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये उदगाव ता. शिरोळ येथील शेतकरी राजाराम दत्तू कदम (वय 74) यांचे दुर्दैवी मृत्यू झाला. सहा दिवसांच्या उपचारानंतरही राजाराम यांचा आज गुरुवारी निधन झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, कदम यांच्या शेतामध्ये आठ दिवसांपूर्वी उसाची तोडणी झाली होती. उर्वरित कामानिमित्त ते शेतात गेले होते. झाडावर असणारे मधमाशांचे पोळे त्यांच्या निदर्शनास आले नाही. थोड्याच वेळात मधमाशांनी कदम यांच्यावर चारही बाजूंनी हल्ला करत गंभीर स्वरूपाचा चावा घेतला. त्यांनतर तातडीने त्यांना मिरज येथील खाजगी दवाखान्यात हलविले होते. गुरुवारी सकाळी त्यांचे राहत्या घरी दुःखद निधन झाले.
उदगाव विकास सोसायटीचे उपाध्यक्ष रमेश कदम यांचे वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई,एक मुलगा, सुन,नातवंडे असा परिवार आहे.