चिकोडी केएलई रुग्णालयात मोफत मधुमेह तपासणी शिबिर
वार्ताहर/ चिक्कोडी
ऐशोआरामी जीवन, श्रमरहित जीवनशैली, अतिदबाव, स्थूलपणा तसेच मोबाईल, संगणक, टीव्ही आदींचा अतिवापर त्याचबरोबर अनुवंशिकतेमुळे मधुमेह रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मधुमेहावर मात करण्यासाठी वेळीच उपचार घेऊन खबरदारी घेतल्यास यापासून सुटका होणे शक्मय आहे, असे मत केएलई संस्थेचे संचालक बी. आर. पाटील यांनी व्यक्त केले. चिकोडी येथील केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे उद्घाटन करून ते बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले, पूर्वी भारतात मधुमेह रुग्णांची संख्या फारच विरळ होती. आता जगात मधुमेह रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱया क्रमांकावर आहे. त्यातही एक तृतीयांश रुग्ण दक्षिण भारतात असल्याने या भागासाठी हा चिंतेचा विषय आहे. मधुमेह असणाऱयांनी नियमित तपासणी करून घ्यावी. मानसिक धैर्याने याचा सामना करावा व निरोगी जगण्यासाठी योजना राबविणे आवश्यक असल्याचे सांगितले.
रुग्णालयाचे मुख्य वैद्याधिकारी डॉ. धीरज पोळ म्हणाले, मधुमेहापासून सुटका करून घ्यायची झाल्यास वैद्यांच्या सल्ल्यानुसार नियमित आहारपद्धती, साधारण जीवनशैली, नित्यक्रम, व्यायाम आदी उपक्रम व शिस्तपालन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे शक्मय आहे. निसर्गाशी एकरुप होऊन जीवन जगल्यास कोणत्याही रोगापासून अलिप्त राहता येते, असे त्यांनी सांगितले.
शिबिरात 62 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. राणी गाली, डॉ. दयानंद होसपेटी, डॉ. प्रभावती मुगळखोड, डॉ. अरविंद मिणचे व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी महांतेश गुडन्नवर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.