वृत्तसंस्था/ कोईमतूर
नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत राज्यातील मंदिरे उघडी ठेवण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला हिंदू मुन्नानी या संघटनेने विरोध केला आहे. मध्यरात्री मंदिरात जाणे ही हिंदूंची परंपरा नाही. मंदिरांमध्ये पहाटे किंवा दिवसाच्या काळात पूजा अर्चा आणि अभिषेक होतात. रात्री मंदिरे परंपरेनुसार बंद ठेवावी लागतात. तामिळनाडू सरकारने हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरांचा भंग करू नये असे आवाहन हिंदू मुन्नानीचे प्रमुख नेते कादेश्वर सुब्रमनियन यांनी केले आहे. केवळ शिवरात्र आणि वैकुंठ एकादशी या दोनच प्रसंगी मध्यरात्रीपर्यंत मंदिरे उघडी असतात असे प्रतिपादन त्यांनी केले.