प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानक ते अशोक चौक भागामध्ये असलेली झाडे तोडण्यात आली. मात्र, त्यांचे बुंधे गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यावरच पडून आहेत. ते हटविण्याकडे साऱयांचेच दुर्लक्ष झाले आहे. या बुंध्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा तातडीने हे बुंधे हटवावेत, अशी मागणी होत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून मध्यवर्ती बसस्थानकाचे काम सुरू आहे. मध्यवर्ती बस स्थानकापासून अशोक चौकपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे.
त्यावेळी ही झाडे तोडण्यात आली. झाडांच्या फांद्या हटविण्यात आल्या. मात्र, बुंधे तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे समस्या निर्माण झाली असून तातडीने ते हटवावेत, अशी मागणी होत आहे. त्या ठिकाणी कचऱयाचे साम्राज्यही पसरले आहे. तो परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी होत आहे.