मंगळवारी 8500 रुपये दंड वसूल : महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत असल्याने मास्क वापरणे सक्तीचे
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूंच्या प्रसाराला वर्ष झाले, पण धास्ती कायम आहे. देशातील विविध राज्यात कोरोना विषाणूंचा प्रसार वाढला आहे. कर्नाटकशेजारी असलेल्या महाराष्ट्र राज्यात अधिक रुग्ण असल्याने विविध खबरदारीच्या योजना राबविण्यात येत आहेत. बेळगाव महानगरपालिकेने मास्क वापरणे सक्तीचे करून दंड आकारण्यास प्रारंभ केला आहे. दररोज दंड वसुली करण्यात येत असून, मंगळवारी 8 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.
कोरोना विषाणूंची धास्ती पुन्हा वाढू लागली आहे. विविध राज्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रात दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. राज्यात दाखल होणाऱया मार्गांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शहरात येण्यासाठी कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच शहरवासियांना कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना विषाणूंच्या रुग्णात घट झाल्याने मास्क वापरण्याकडे शहरवासियांनी दुर्लक्ष केले होते. मात्र, परराज्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. याकरिता दंडात्मक कारवाईस प्रारंभ करण्यात आला आहे. मागील 8 दिवसांपासून विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मागील दोन दिवसात दररोज 8500 रुपये दंड वसूल करण्यात आला. शहरातील विविध भागात विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईक करून दंड वसुली करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आहे.