प्रतिनिधी/ बेळगाव
विनामास्क फिरणाऱया तसेच व्यवसाय करणाऱया नागरिकांवर कारवाईचा बडगा सुरूच आहे. 100 वरून 250 रुपये दंड आकारण्यात येऊनही नागरिक विनामास्क फिरत आहेत. 250 रुपये दंड आकारण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेकडूनही दंड वसुलीची कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र, दंडाची रक्कम वाढविण्यात आल्याने कारवाईला शिथिलता आली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत चालल्याने रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढत चालला आहे. कोरोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेणे हा एकच पर्याय आहे. त्याकरिता तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ धुणे अशा विविध उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी फिरताना तेंडाला मास्क लावणे आणि सामाजिक अंतर ठेवण्याची सूचना करून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. व्यवसाय करताना किंवा बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश राज्य शासनाने बजावला आहे. त्यामुळे यापूर्वी विनामास्क फिरणाऱयांकडून 100 रुपये दंड वसूल करण्यात येत होता. तरीदेखील नागरिक विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे 100 रुपयांवरून दंडाची रक्कम 1000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण विरोध झाल्याने ही रक्कम 250 रुपये करण्यात आली आहे. विनामास्क फिरणाऱयांकडून दंड वसूल करण्याचा अधिकार पोलीस प्रशासनालादेखील देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महापालिकादेखील विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करून दंड वसूल करीत आहे. 100 रुपये दंड असताना ही मोहीम तीव्रपणे राबविण्यात आली होती. पण दंडाची रक्कम वाढविण्यात आल्याने महापालिकेच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे. काही मोजक्मयाच ठिकाणी ही कारवाई करण्यात येत आहे. दंडाची रक्कम वाढविण्यात आल्याने कारवाई करताना महापालिकेच्या अधिकाऱयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. काही वेळा अधिकारी आणि नागरिकांमध्ये वाददेखील होत आहेत. तरीदेखील महापालिकेकडून ही कारवाई राबविण्यात येत आहे. 250 रुपये दंड देण्यास नागरिक टाळाटाळ करीत असल्याने महापालिकेच्या विनामास्क कारवाईला मरगळ आली आहे.