बेळगाव/ प्रतिनिधी
महापालिका वॉर्ड पुनर्रचना करण्याबाबत नगरविकास खात्याकडून महापालिकेला अद्याप कोणताच आदेश आला नाही. त्यामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक सप्टेंबरनंतर होण्याची शक्मयता आहे.
महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण चुकीच्या पद्धतीने झाले असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. नव्याने वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण करण्याचे प्रतिज्ञापत्र नगरविकास खात्याने न्यायालयात दाखल केले होते. त्यामुळे वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण तातडीने जाहीर करून निवडणुका घ्याव्यात, असा निकाल न्यायालयाने सप्टेंबरमध्ये दिला होता. पण न्यायालयाचा निकाल लागून 5 महिने उलटले तरी अद्याप नगरविकास खात्याकडून याबाबत महापालिकेला कोणत्याच सूचना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नव्याने वॉर्ड पुनर्रचना करण्याचे काम ठप्प झाले आहे. नगरविकास खात्याकडून आदेश आल्यानंतरच वॉर्ड पुनर्रचनेची प्रक्रिया मार्गी लागणार आहे. पण शासनाने याबाबत मौन बाळगले असल्याने वॉर्ड पुनर्रचना कधी होणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिका निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी तयारी केली होती. पण न्यायालयाच्या या निकालामुळे इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. नव्याने वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण कधी होणार, याकडे शहरवासियांचे व इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
वॉर्ड पुनर्रचना करण्यासाठी अधिसूचना जारी झाल्यानंतर किमान 3 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्मयता आहे. त्यानंतर नगरविकास खात्याकडून वॉर्ड आरक्षण जाहीर करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक होणार आहे. पण सध्या वॉर्ड पुनर्रचना करण्याच्यादृष्टीने शासनाकडून कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक घेता येणार आहे. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्मयता आहे. पावसाळय़ात निवडणूक घेणे अशक्मय आहे. त्यामुळे सप्टेंबरनंतरच निवडणुकीचे काम मार्गी लागण्याची शक्मयता आहे..