ग्रामीण भागात राहणाऱया अकुशल कामगारांना गावातच रोजगार उत्पन्न व्हावा आणि त्याद्वारे सामुहिक मालमत्ता निर्माण होऊन गावे आत्मनिर्भर व्हावीत व मजुरांचा शहराकडे वाढता कल रोखण्यासाठी आणि ग्रामीण विकासासाठी ‘मनरेगा’ अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र शासनाने कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत रोजगाराची हमी दिलेली आहे. या योजने अंतर्गत वैयक्तिक तसेच सार्वजनिक कामे उदाहरणार्थ दळणवळण, जलसिंचन, भूविकास, जलसंधारण या स्वरूपाची कामे हाती घेऊन गावाचा सर्वांगीण विकास आणि ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावणे शक्मय होणार आहे. तसेच मिळणाऱया वेतनातून त्यांची क्रयशक्ती वाढून त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊन त्यांचे राहणीमान आणि जीवनशैली सुधारणार आहे. ग्रामीण भागातील योजनेअंतर्गत पात्र कुटुंबातील प्रौढ सदस्य त्यांचे नाव, वय आणि पत्ता ग्रामपंचायतीकडे नोंदणी करतील व जॉब कार्ड उपलब्ध करून त्याद्वारे अर्ज करून काम करू शकतात अशी ही योजना आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास विभागाने 26 जून 2020 रोजी वैयक्तिक लाभाच्या योजनेखाली जनावरांचे गोठे, शेड बांधकाम आणि वैरण विकास संदर्भात विशेष सूचना आणि मार्गदर्शन केले आहे. राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजना, जिल्हा वार्षिक योजना, तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सेस फंडातील योजनेअंतर्गत पुष्कळ वेळेला फक्त पशुधन पुरवठा, वाटप केले जाते. वैरण विकासाच्या योजनेअंतर्गत देखील सर्व इच्छुक लाभार्थींना लाभ मिळतोच असे नाही. त्यामुळे या योजना काही प्रमाणात अपयशी ठरण्याची शक्मयता नाकारता येत नाही. सर्व पशुधन संबंधित योजनांमध्ये व्यवस्थापनाला फार मोठे महत्त्व आहे आणि या व्यवस्थापनाअंतर्गत निवारा आणि आहार याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचा विचार करून या दोन्ही बाबी समाविष्ट करून वैयक्तिक लाभाच्या योजनेखाली मनरेगा अंतर्गत या योजना राबविण्यात येणार आहेत.
एकूणच आपल्या देशात पशुसंवर्धन हा विभाग वेगाने वाढणारा आणि सर्वांना आरोग्य रोजगार आणि आत्मनिर्भर बनवू शकणारा विभाग आहे. ग्रामीण भागातील योजनेतील निकषानुसार ज्यांच्याकडे स्वमालकीची जमीन आहे असे भूमिहीन, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती जमाती, भटक्मया विमुक्त जमाती, दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबे ही रोजगारांपेक्षा स्वयंरोजगाराकडे वळावीत त्यासाठी या योजनेत पशुसंवर्धन विषयक या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत पशुसंवर्धन विभागाने सर्व तांत्रिक सहकार्य पुरवणे तसेच स्थानिक स्तरावर मनरेगा योजना अंमलबजावणीसाठी वार्षिक आराखडा तयार करणारे उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना, नियोजन विभाग यांनी पुढाकार घेणे, सहकार्य करणे व योजना राबविणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषदादेखील आपल्या स्तरावर ही योजना राबवू शकतात. जिल्हा दूध संघ देखील अशा इच्छुक दूध उत्पादक, ज्यांना निवारा शेड करणे आवश्यक आहे याची गावनिहाय यादी करून ग्रामसभेच्या मंजुरीने त्यांना लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा करू शकतात.
ग्रामीण भागात आजही पुष्कळ ठिकाणी दुग्ध व्यवसायाकडे पारंपरिक व्यवसाय म्हणून पाहिले जाते. गोठा शेड बांधकाम यासाठी इतके महत्त्व दिले जात नाही. गोठा हा शास्त्राsक्त पद्धतीने न बांधता फक्त निवारा स्वरूपात बांधलेला असतो. तसेच गोठय़ातील जमीन योग्य प्रकारची नसल्याने रोगराईचे प्रमाण वाढते. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. गव्हाण देखील अत्यंत महत्त्वाची बाब पण तीदेखील दुर्लक्षित झाल्याने समोर मोकळय़ा जागेत किंवा लाकडाचे ओंडके टाकून वैरण टाकली जाते. त्यामुळे वैरणीचे नुकसान होते, उत्पादन खर्च वाढतो. या व्यवसायातील शेण आणि मूत्र सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक बाबी आहेत ते देखील व्यवस्थित न साठल्यामुळे पुष्कळवेळा वाया जाते. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता धोक्मयात येते आणि एकंदरच कुटुंबाचे आर्थिक आरोग्य बिघडते हे सर्व टाळण्यासाठी गोठा बांधकाम हे कमीत कमी शास्त्राsक्त पद्धतीने होणे आवश्यक आहे आणि नियमित वैरण पुरवठा देखील होणे अपेक्षित आहे.
या योजनेअंतर्गत सहा जनावरांसाठी 26.95 चौरस मीटर म्हणजे 7.7 मीटर लांब व 3.5 मीटर रुंद जागेवर सिमेंट काँक्रीटचा थर टाकून, 7.7 मीटर लांब, 0.2 मीटर रुंद व 0.65 मीटर उंच आकाराची गव्हाण व साधारण 250 लिटर साठवण क्षमता असलेली मूत्र साठवण टाकी बांधता येईल. यासाठी मजुरी अनुदान म्हणून रुपये पस्तीस हजार उपलब्ध होतील. ज्यांच्याकडे स्वमालकीची जमीन आहे ते लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अशा प्रकारच्या कामासाठी मजुरी वरील खर्च कमी येऊन या योजनेचा परिपूर्ण लाभ घेता येतो तसेच अंजन गवत, श्रावण घास, हत्ती गवत व अझोला लागवड आणि उत्पादन या बाबीदेखील समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
शेळीपालन शेडसाठीदेखील दहा शेळय़ांकरिता 7.50 चौ.मीटर म्हणजे 3.75 मीटर लांब व 2 मीटर रुंद अशा आकाराचा निवारा बांधता येतो यामध्ये देखील रु. 35000/- इतके मजुरी अनुदान देय आहे. याच आकाराचे शेड 100 कुक्कुट पक्ष्यासाठी सुद्धा बांधता येते. या सर्व ठिकाणी स्थानिक वस्तू आणि सामान वापरून आपण छत आणि बाजूची रचना, बांधणी उभा करू शकतो.
या योजनांचा समावेश यापूर्वीच मनरेगामध्ये होता. आताच्या सद्यस्थितीत गावाकडे परतलेल्या सर्वांच्या हाताला काम आणि शाश्वत उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने 26 जून 2020 रोजी याला गती देण्याबाबत सूचित केले आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता पंचायत समिती स्तरावर ही योजना राबवताना ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, पशुसंवर्धन, बांधकाम आणि वित्त विभागाचा संबंध येतो. या सर्वांनी समन्वयाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे. मजुरी आणि सामुग्री मूल्य याचे 30:70 हे प्रमाण बसवताना स्थानिक स्तरावर अडचणी येऊ शकतात. तसेच वैरण विकास याबाबतीत योजनेची सुरुवात, अंमलबजावणी आणि फलश्रुती यामध्ये अंतर फार कमी आहे त्यामुळे फोटोंच्या माध्यमातून सत्यता पडताळून वेळोवेळी संबंधित सर्व विभागांनी व विभागप्रमुखांनी सकारात्मकता नोंदवली तर योजना राबण्यात आणि राबवण्यास काहीही अडचण येणार नाही. अर्थात पशुपालक लाभार्थी यांचे योगदान आणि सहकार्य ही तितकेच महत्त्वाचे आहे.
डॉ. व्यंकटराव घोरपडे,
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली